शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

प्राधिकरणाची ‘अंत्ययात्रा’ पालिकेच्या दारात!

By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST

‘फुटबॉल’ थांबवा : पाण्यासाठी आक्रमक करंजेकरांची अंत्यसंस्कारांच्या गाडीतून पालिकेला धडक

सातारा : ‘नव्या-जुन्या जलवाहिन्या, टाक्या, व्हॉल्व्ह यांच्या घोळात आम्हाला अडकायचे नाही. पालिका आणि जीवन प्राधिकरणाच्या मध्ये ‘फुटबॉल’ व्हायचे नाही; आम्हाला फक्त पाणी पाहिजे,’ अशी गर्जना करीत करंजे पेठेतील नागरिक बुधवारी रस्त्यावर उतरले. करंजे भागातील सर्व रस्ते दीड तास अडवून धरल्यानंतर संतप्त नागरिक आणि महिला थेट अंत्यसंस्काराच्या गाडीत जाऊन बसल्या आणि पालिकेच्या दारात ‘जय जय राम’चा कल्लोळ झाला.करंजे पेठेत नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची, या गोंधळात निम्मे करंजे पाण्यापासून वंचित आहे. शनिवारपासून एक थेंब पाणी आले नाही. प्राधिकरणाचे मीटर अजून चालू झालेले नाहीत. नागरिक पाणीपट्टी पालिकेतच भरतात. पालिका प्राधिकरणाकडे बोट दाखविते. दोन्ही यंत्रणा तांत्रिक कारणे सांगतात आणि पाणी मात्र मिळत नाही, अशी कैफियत नागरिकांनी मांडली. अंत्यसंस्कारांची गाडी पालिकेच्या दारात थांबताच नागरिकांनी राजपथावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. महिलावर्ग यात आघाडीवर होता. नंतर ‘पालिका जय जय राम,’ ‘एवढी माणसं कशाला, पालिकेच्या मयतीला’ अशा घोषणा देत जमाव पालिकेत घुसला.थेट नगराध्यक्षांच्या दालनातच जाऊन नागरिक मोठमोठ्याने कैफियत मांडू लागले. नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, दत्तात्रय बनकर, भाग्यवंत कुंभार आदींनी पालिकेच्या बाजूने ‘बॅटिंग’ करण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकारी अभिजित बापट, पाणीपुरवठा खात्याचे पी. एन. साठे यांनीही ‘गार्ड’ घेतले; परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दीड महिन्यापासून करंजेतील निम्म्या भागावर अन्याय होत असून, काही ठिकाणी नियमित पाणी येते तर काही भाग कोरडा आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. श्रीपतराव पाटील हायस्कूलजवळचा बंद केलेला व्हॉल्व्ह तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांनीही तसे आदेश दिले आणि क्षोभ थोपविला. (प्रतिनिधी)‘त्यांना’च इकडे बोलवानगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकाऱ्यांबरोबरच शिवसेनेचे नरेंद्र पाटीलही नागरिकांना आवरण्यासाठी खिंड लढवीत होते. जीवन प्राधिकरणानेच करंजे पेठेला पाणी देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपण सगळेच प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊ,’ असे नगरसेवक अविनाश कदम यांनी नागरिकांना सांगितले, तेव्हा नागरिक आणखी संतप्त झाले. ‘भर उन्हाळ्यात प्यायला सकाळपासून एक थेंब पाणी नाही. उन्हात आंदोलन करीत आहोत. आता आम्ही तिकडे येणार नाही. त्यांनाच इकडे बोलवा,’ असा पवित्रा त्यांनी घेतला.‘दोन्हीघरचा पाहुणा’ तहानलेलाकरंजे गावठाण आणि पेठेच्या काही भागात गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. जीवन प्राधिकरणाच्या नव्या वाहिन्या जोडल्यानंतर पाणीप्रश्न सुटण्याऐवजी बिकट बनला आहे. पालिकेच्या जुन्या जलवाहिन्यांमधील पाण्याने काही महिन्यांपूर्वी गॅस्ट्रोची लागण झाली होती. तथापि, त्यावेळी निदान पाणी मिळत तरी होते, आता तेही बंद झाले, असा सूर नागरिक आळवत होते. हे मतांपुरते, ते वसुलीपुरते!पालिकेच्या मुख्य दरवाजात येताच नागरिकांनी ‘करंजेतील नगरसेवक कुठे आहेत,’ असा सवाल उपस्थित केला. पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू असताना चार नगरसेवकांपैकी तसेच अधिकाऱ्यांपैकी कोणीही तिकडे फिरकले नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. केवळ मतांपुरत्या येणाऱ्या नगरसेवकांचा धिक्कार करून नगराध्यक्षांच्या दालनात शिरलेल्या नागरिकांना ‘ही पालिकेची नव्हे; प्राधिकरणाची जबाबदारी आहे,’ असे ऐकावे लागले. त्यामुळेही क्षोभ उसळला आणि ‘वसुलीसाठी पालिकेचे अधिकारी कसे येतात,’ असा उलट सवाल नागरिकांनी केला.अशास्त्रीय जोडणीचा फटका?करंजे भागातील सुमारे दहा हजार लोकसंख्येसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी केवळ पाच लाख लिटरची असल्याने पाणी पुरत नाही, असे तांत्रिक कारण भाग्यवंत कुंभार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, बसाप्पा पेठेतून करंजेकडे येणाऱ्या मुख्य वाहिनीलाच दीडशे जोड देण्यात आले असल्याने पाणी पुढे सरकतच नाही, असा दावा नागरिकांनी केला.