शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या दराचे वांदे, विक्रीची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांचे सोयाबीन आल्या आल्या लगेच व्यापाऱ्यांकडून दर पाडणे सुरु झाले आहे. ...

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे सोयाबीन आल्या आल्या लगेच व्यापाऱ्यांकडून दर पाडणे सुरु झाले आहे. मागील आठवड्यात ९ हजार क्विंटलवर गेलेला दर या आठवड्याची सुरुवात होताच एकदम साडेपाच हजारापर्यंत खाली आल्याने उत्पादक हबकले आहेत. पण एकूणच आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या इंदूरमधील दर पाहता सोयाबीनचे भाव ६५०० रुपयांच्या खाली येणार नाहीत, त्यामुळे उत्पादकांनी दर पाडण्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रवृत्तीला बळी न पडता विक्रीची घाई टाळायला हवी.

यावर्षी सोयाबीनच्या दराने ऐतिहासिक उसळी घेतली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उत्पादनात झालेली घट आणि कोरोनामुळे सोया प्रॉडक्टची मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे. त्याचमुळे कृषी मूल्य आयोगाने ठरवून दिलेल्या ३९०० रुपये क्विंटल या हमीभावापेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे. मार्चमध्ये ४३०० रुपये असणारा दर आता सप्टेंबरची सुरुवात झाल्यावर तब्बल ११ हजारांवर गेला. पण यातील आर्द्रता, बारदान, काडीकचरा असे नियम लावून प्रतवारीनुसार ८ ते ९ हजार रुपये क्विंटल असा दर मिळू लागला. पण आता ऊन पडल्याने सोयाबीन कापणीला वेग आला आहे. एकदमच माल बाजारात येत असल्याने व्यापाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे दर पाडण्याचे कारस्थान सुरू केले आहे.

तथापि सोयाबीनचे देशातंर्गत भाव ठरणाऱ्या इंदूर येथील केंद्रावर या वर्षी ६५०० रुपयांच्या खाली सोयाबीनचा दर येणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. सोया प्रॉडक्टची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त आहे. मागणीपेक्षा उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी कमीच झाले आहे, त्यामुळे हा किमान दर बाजारात टिकून राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना भीती घालून सोयाबीन खरेदी करुन साठेबाजी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. आता प्रतवारीनुसार साडेपाच हजारांपर्यंत दर दिला जात आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा हा कावा लक्षात घेऊन स्वत:च साठवणूक करुन ठेवावी, बाजारात दरात आणखी वाढ होणार असल्याचे या क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

चौकट

दरात मिळवले, मजुरीत घालवले

सोयाबीनचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्याने त्याच्या मळणी व मजुरीच्या खर्चातही वाढ झाली आहे. मळणीचा क्विंटलचा दर ३५० रुपये झाला आहे, तर मजुरीचा दर प्रती मजूर दोनशे ते तीनशे रुपये झाला आहे. या वर्षी महापूर, अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने घेतलेल्या उघडीपीमुळे आधीच सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच मळणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची अवस्था दरात मिळवले आणि मजुरीत घालवले अशी झाली आहे.