शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अंतरिम नको अंतिम वेतनवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:25 IST

कोपार्डे : मुदत संपल्यानंतर दोन वर्षांनी साखर कामगारांच्या नवीन वेतन करार अभ्यासासाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली आहे. पण, कारखानदार ...

कोपार्डे : मुदत संपल्यानंतर दोन वर्षांनी साखर कामगारांच्या नवीन वेतन करार अभ्यासासाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली आहे. पण, कारखानदार शासन प्रतिनिधी व राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्यात वेतन कराराबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, नवीन वेतन करार कधी अंमलात येणार याबाबत साखर कामगारांच्या उत्सुकता आहे. राज्य साखर कामगार संघटनेने आम्हाला अंतरिम नको अंतिम पगार वाढ द्या अशी भूमिका घेतली आहे. आज, मंगळवारी त्रिपक्षीय वेतन समितीची पाचवी बैठक आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे साखर कामगारांचे लक्ष लागले आहे.

वेतन कराराची मुदत संपल्यानंतर ८ डिसेंबरला तब्बल दोन वर्षांनी त्रिपक्षीय वेतन समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ६२ जणांच्या समितीत कारखानदार, शासकीय प्रतिनिधी व साखर कामगार प्रतिनिधींचा यात समावेश आहे. त्रिपक्षीय समितीच्या तीन महिन्यांत चार बैठका झाल्या; पण या बैठकीत कधी साखर कामगार, तर कधी शासकीय अधिकारी गैरहजर राहिल्याने राज्य साखर कामगार प्रतिनिधींना वेतन कराराबाबत ठाम भूमिका मांडण्यास अडचणी येत आहेत.

त्रिपक्षीय समितीच्या गेल्या चार बैठकात साखर कामगार संघटनेची मुख्य मागणी असणारी वेतनवाढीसंबंधात चर्चाच झाली नसल्याचे चित्र आहे. २६ फेब्रुवारीच्या बैठकीत अंतिम पगारवाढ जाहीर होणार असल्याचे राज्य साखर कामगार संघटनेने आशावाद जाहीर केला होता. पण, या बैठकीला अनेक कारखानदारांनी दांडी मारल्याने खुद्द त्रिपक्ष समिती अध्यक्ष नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज त्रिपक्षीय वेतन समितीची बैठक (दि. १६ मार्च) होणार आहे. या बैठकीकडे साखर कामगारांचे लक्ष लागले आहे.

कोट : गेल्या चार बैठकीत स्टँपिंग पॅटर्न व राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कामगारांचे थकविलेले वेतन याबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली आहे. वेतन करारावरही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. राऊसो पाटील (साखर कामगार संघटना सदस्य)

कोट : वेतन कराराला दोन वर्ष विलंब झाला आहे. वेतनवाढ झाली की मागील फरकाची रक्कम देण्यासाठी साखर कारखाने चालढकल करतात. ती मिळविण्यासाठी पुन्हा स्थानिक संघटनाना संघर्ष करावा लागतो. लवकरात लवकर वेतनवाढ करार करून साखर कामगारांना न्याय द्यावा. संदीप भोसले