शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

अंतरिम नको अंतिम वेतनवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:25 IST

कोपार्डे : मुदत संपल्यानंतर दोन वर्षांनी साखर कामगारांच्या नवीन वेतन करार अभ्यासासाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली आहे. पण, कारखानदार ...

कोपार्डे : मुदत संपल्यानंतर दोन वर्षांनी साखर कामगारांच्या नवीन वेतन करार अभ्यासासाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली आहे. पण, कारखानदार शासन प्रतिनिधी व राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्यात वेतन कराराबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, नवीन वेतन करार कधी अंमलात येणार याबाबत साखर कामगारांच्या उत्सुकता आहे. राज्य साखर कामगार संघटनेने आम्हाला अंतरिम नको अंतिम पगार वाढ द्या अशी भूमिका घेतली आहे. आज, मंगळवारी त्रिपक्षीय वेतन समितीची पाचवी बैठक आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे साखर कामगारांचे लक्ष लागले आहे.

वेतन कराराची मुदत संपल्यानंतर ८ डिसेंबरला तब्बल दोन वर्षांनी त्रिपक्षीय वेतन समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ६२ जणांच्या समितीत कारखानदार, शासकीय प्रतिनिधी व साखर कामगार प्रतिनिधींचा यात समावेश आहे. त्रिपक्षीय समितीच्या तीन महिन्यांत चार बैठका झाल्या; पण या बैठकीत कधी साखर कामगार, तर कधी शासकीय अधिकारी गैरहजर राहिल्याने राज्य साखर कामगार प्रतिनिधींना वेतन कराराबाबत ठाम भूमिका मांडण्यास अडचणी येत आहेत.

त्रिपक्षीय समितीच्या गेल्या चार बैठकात साखर कामगार संघटनेची मुख्य मागणी असणारी वेतनवाढीसंबंधात चर्चाच झाली नसल्याचे चित्र आहे. २६ फेब्रुवारीच्या बैठकीत अंतिम पगारवाढ जाहीर होणार असल्याचे राज्य साखर कामगार संघटनेने आशावाद जाहीर केला होता. पण, या बैठकीला अनेक कारखानदारांनी दांडी मारल्याने खुद्द त्रिपक्ष समिती अध्यक्ष नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज त्रिपक्षीय वेतन समितीची बैठक (दि. १६ मार्च) होणार आहे. या बैठकीकडे साखर कामगारांचे लक्ष लागले आहे.

कोट : गेल्या चार बैठकीत स्टँपिंग पॅटर्न व राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कामगारांचे थकविलेले वेतन याबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली आहे. वेतन करारावरही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. राऊसो पाटील (साखर कामगार संघटना सदस्य)

कोट : वेतन कराराला दोन वर्ष विलंब झाला आहे. वेतनवाढ झाली की मागील फरकाची रक्कम देण्यासाठी साखर कारखाने चालढकल करतात. ती मिळविण्यासाठी पुन्हा स्थानिक संघटनाना संघर्ष करावा लागतो. लवकरात लवकर वेतनवाढ करार करून साखर कामगारांना न्याय द्यावा. संदीप भोसले