गडहिंग्लज :
आत्मविश्वास, कौशल्य, विषयाचे ज्ञान व दृष्टिकोन यावरच यशस्वी होता येते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी मार्कांच्या पाठीमागे न लागता शिक्षणाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे मत प्रा. रवींद्र खैरे यांनी व्यक्त केले.
येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित यशवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी म्हणाले, ग्लोबल व डिजिटल विश्वामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी बदलत्या काळानुसार नवे बदल स्वीकारावेत. यावेळी मयूरी पाटील, प्रीती सावंत, गौरी तेली, विद्या आमाते, स्वाती चिंचेवाडी यांच्यासह ३८ यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. सुभाष शिरकोळे, अनिता चौगुले, प्रीती सावंत, राजलक्ष्मी रुडगी, ज्याती माने यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्राचार्य विजयकुमार चौगुले, चंद्रशेखर मठपती, महावीर मरजे, श्रीरंग तांबे, सुनील देसाई उपस्थित होते.
विभागप्रमुख चिदानंद कानडे यांनी प्रास्ताविक केले. पुंडलिक रक्ताडे व विजय काळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
-------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी रवींद्र खैरे, अरविंद कित्तूरकर, चिदानंद कानडे, सुभाष शिरकोळे, सुनील देसाई, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०२२०२१-गड-०७