शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बेलदार समाजाचा तहसील कार्यालयावर गाढवभेट मोर्चा

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

प्रलंबित मागण्या : भटक्या समाजावर अन्याय होत असल्याची कैफियत

दापोली : महाराष्ट्र राज्यातील दुर्लक्षित भटक्या बेलदार समाजाला आजही उपेक्षित जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही. अशा या भटक्या समाजावर पूर्वी ब्रिटिश व आता प्रशासन अन्याय करीत आहे. समाजावरील अन्यायाच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेद्वारे मोर्चा काढण्यात आला. हर्णै येथील भटक्या बेलदार समाजाच्या झोपड्यांवर कारवाई करुन त्यांना बेघर करण्यात आले होते. अशा या बेघर कुटुंबांवरील अन्यायाच्या विरोधात राज्यातील पहिला गाढव भेट मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.हर्णै येथील १५ झोपड्यांवर तत्कालीन तहसीलदारांनी २००५ साली कारवाई करुन झोपड्या तोडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून गेली १० वर्षे हा भटका समाज बेघर जीवन जगत आहे. मात्र, शासनाने या समाजाची दखल घेतली नाही. प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी रवींद्र चव्हाण, अध्यक्ष बेलदार भटका समाज महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली एकवटला. जोपर्यंत हर्णै येथील बेलदार समाजाला हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. (प्रतिनिधी)बेलदार समाजाच्या न्याय हक्कांसाठी आमचा लढा आहे. समाजाचे हक्क मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मात्र, १ महिना होऊन गेला तरी मुख्यमंत्री साधी दखल घेत नाहीत. निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना हात पुढे केला. परंतु हात मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातसुद्धा पुढे केला नाही. त्यामुळे फडणवीस यांनी या समाजाचा अपमान केला होता. संख्येने कमी आहोत म्हणूनही दखल घेतली जात नसेल परंतु आम्ही आमची ताकद नक्की दाखवू.- अध्यक्ष, बेलदार समाज, रवींद्र चव्हाण.ंभटक्या बेलदार समाजाकडून सरकारी जागेचा प्रस्ताव आल्यास नक्की योग्य तो विचार केला जाईल. २००५ला सरकारी जागेवरील बेकायदा घरे शासनाच्या आदेशानुसार तोडण्यात आली होती. बेलदार समाजाने सरकारी जागेचा प्रस्ताव दिल्यास त्यांना सरकारी जागा मिळण्यासाठी शासनकाडे प्रस्ताव पाठवू.- कल्पना गोडे, तहसीलदार