शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बेलदार समाजाचा तहसील कार्यालयावर गाढवभेट मोर्चा

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

प्रलंबित मागण्या : भटक्या समाजावर अन्याय होत असल्याची कैफियत

दापोली : महाराष्ट्र राज्यातील दुर्लक्षित भटक्या बेलदार समाजाला आजही उपेक्षित जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही. अशा या भटक्या समाजावर पूर्वी ब्रिटिश व आता प्रशासन अन्याय करीत आहे. समाजावरील अन्यायाच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेद्वारे मोर्चा काढण्यात आला. हर्णै येथील भटक्या बेलदार समाजाच्या झोपड्यांवर कारवाई करुन त्यांना बेघर करण्यात आले होते. अशा या बेघर कुटुंबांवरील अन्यायाच्या विरोधात राज्यातील पहिला गाढव भेट मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.हर्णै येथील १५ झोपड्यांवर तत्कालीन तहसीलदारांनी २००५ साली कारवाई करुन झोपड्या तोडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून गेली १० वर्षे हा भटका समाज बेघर जीवन जगत आहे. मात्र, शासनाने या समाजाची दखल घेतली नाही. प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी रवींद्र चव्हाण, अध्यक्ष बेलदार भटका समाज महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली एकवटला. जोपर्यंत हर्णै येथील बेलदार समाजाला हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. (प्रतिनिधी)बेलदार समाजाच्या न्याय हक्कांसाठी आमचा लढा आहे. समाजाचे हक्क मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मात्र, १ महिना होऊन गेला तरी मुख्यमंत्री साधी दखल घेत नाहीत. निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना हात पुढे केला. परंतु हात मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातसुद्धा पुढे केला नाही. त्यामुळे फडणवीस यांनी या समाजाचा अपमान केला होता. संख्येने कमी आहोत म्हणूनही दखल घेतली जात नसेल परंतु आम्ही आमची ताकद नक्की दाखवू.- अध्यक्ष, बेलदार समाज, रवींद्र चव्हाण.ंभटक्या बेलदार समाजाकडून सरकारी जागेचा प्रस्ताव आल्यास नक्की योग्य तो विचार केला जाईल. २००५ला सरकारी जागेवरील बेकायदा घरे शासनाच्या आदेशानुसार तोडण्यात आली होती. बेलदार समाजाने सरकारी जागेचा प्रस्ताव दिल्यास त्यांना सरकारी जागा मिळण्यासाठी शासनकाडे प्रस्ताव पाठवू.- कल्पना गोडे, तहसीलदार