शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

‘डॉल्बीमुक्तीचा आवाज’ पोहोचेल राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:43 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या बिंदू चौकातून जर एखादा संदेश दिला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात जातो,’ याची जाहीर कबुली अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याआधी अनेकदा दिली आहे. इथे टोलविरोधात आंदोलन सुरू झाले आणि त्याचा वणवा राज्यभर पसरला. शासनाला अखेर टोलचे धोरण बदलावे लागले. या पार्श्वभूमीवर ‘डॉल्बी मुक्ती’चा ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या बिंदू चौकातून जर एखादा संदेश दिला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात जातो,’ याची जाहीर कबुली अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याआधी अनेकदा दिली आहे. इथे टोलविरोधात आंदोलन सुरू झाले आणि त्याचा वणवा राज्यभर पसरला. शासनाला अखेर टोलचे धोरण बदलावे लागले. या पार्श्वभूमीवर ‘डॉल्बी मुक्ती’चा संदेश देण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. ती न गमावण्यासाठी आता गणेशोत्सव मंडळांतील, तालमीतील, पेठांमधील ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरजआहे.एरव्ही कोल्हापूरकरांच्या हाकेला धावून येणाºया पोलिसांमध्ये आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश प्रतिष्ठापना मिरवणुकीवेळी ‘उभा दावा’ असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. ‘डॉल्बी लावणारच’ असा मंडळांचा हेका आणि ‘सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आम्हाला पाळावे लागतील. तेव्हा कारवाई करायला लावू नका’ अशी सुरुवातीला पोलिसांनी केलेली विनंती, असे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत राजारामपुरीत दिसत होते.मात्र, रात्र होईल तसे वातावरण बदलायला सुरुवात झाली. राजकीय नेतेमंडळी दाखल होऊ लागली. हजारो तरुणांच्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी पोलीस अधिकाºयांसोबत चर्चा सुरू झाल्या. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉल्बीला समर्थन न देण्याचे आवाहन केले. दुसºया दिवशीच्या कार्यक्रमात तर चंद्रकांतदादांनी डॉल्बी लावल्यानंतर तो बंद करणाºया ‘जामर’चा शोध लावल्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले.गेली काही वर्षे डॉल्बीमुळे पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने आवाजाचे बंधन घातले आहे. त्यामुळे त्याचे उल्लंघन करण्यासाठी पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. दुसरीकडे आपल्या युवा मतदारांचा विचार करत लोकप्रतिनिधीही डॉल्बीचे समर्थन करताना दिसत आहेत.एकीकडे समाजासमोर असंख्य प्रश्न ‘आ’ वासून उभे असताना लाखोंच्या देणग्या गोळा करायच्या आणि त्याचा खर्च जर या डॉल्बीवर होणार असेल तर ते भूषणावह नाही. वेगवेगळ्या मंडळांची ईर्ष्या, त्यासाठी उभारल्या जाणाºया डॉल्बीच्या भिंती, महाद्वार रोडवर अधिक काळ थांबता यावं यासाठीचा अट्टाहास, संपूर्ण मिरवणुकीदरम्यान जवळच्या गल्ली-बोळांत जाऊन दारू पिणाºयाचं ओंगळवाणं दर्शन यामुळे ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ बदनाम करण्याचं काम आम्हीच सुरू केलं आहे, याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.५ वर्षे कैद आणि १ लाख रुपये दंडध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सन २००० चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम सन १९८६ चे कलम १५ प्रमाणे ५ वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षा होऊनही पुन्हा असे केल्यास पुढील प्रत्येक दिवसाला ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे तसेच ‘कलम १५ (१) प्रमाणे शिक्षा लागल्यानंतरच्या १ वर्षांपर्यंत असा गुन्हा केल्यास ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.मर्यादेपेक्षा जास्त आवाजाला बंदीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण संरक्षणाचा अधिनियम १९८६ व ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजवण्यास बंदी आहे,तर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतसुद्धा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये खालील मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाजविण्यास बंदी आहे.नोकरीला अडचणीडॉल्बीप्रकरणामध्ये जर पोलीस कारवाई झाली तर नोकरी व पासपोर्ट मिळण्यातही अडचणी निर्माण होतात. अशी अनेक उदाहरणे घडली आहेत. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला अखेरीस न्यायालयात शिक्षा झाली तर नोकरीचा राजीनामा देण्याचे हमीपत्र देऊन मग नोकरी स्वीकारावी लागली आहे. सरकारी नोकरीसाठी तर गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांचेच चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीने द्यावे लागते. इथे अनेक युवकांची अडचण होण्याची शक्यता आहे. नोकºया मिळत नसताना केवळ डॉल्बीचा गुन्हा दाखल असल्याने नोकरी गमावण्याची वेळ येऊ नये, याची काळजी तरुणांनी घेण्याची गरज आहे.आता वरिष्ठांनीच पुढे यावेअजूनही कोल्हापूरच्या पेठांमध्ये, तालमींमध्ये ज्येष्ठ आणि प्रमुख वरिष्ठ कार्यकर्त्यांचा मान राखण्याची परंपरा आहे. डॉल्बीच्या अट्टाहासापोटी जर पोलीस कारवाई अटळ असेल तर ज्येष्ठ, वरिष्ठ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन डॉल्बीमुक्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.बारा महिने या कायद्याची अंमलबजावणी हवीआमच्याच सणावेळी असे नियम आणि कायदे तुम्हाला आठवतात का, असे विचारणाराही वर्ग आहे. पोलीस प्रशासनाला त्याला उत्तर द्यावे लागेल. सर्व सण आणि उत्सवांदरम्यान या नियम, कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. जेणेकरून काही सणांपुरताच हा दबाव टाकला जातो, असे वाटू नये.विभाग कोड विभाग वर्गवारी ध्वनिमर्यादा (डेसिबलमध्ये)दिवसा रात्रीए औद्योगिक क्षेत्र ७५ ७०बी विपणन, व्यावसायिक क्षेत्र ६५ ५५सी रहिवासी क्षेत्र ५५ ४५डी शांतता विभाग ५० ४०येथे आपण तक्रार करू शकताकोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्ष०२३१/२६६२३३३