शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कोणी जमीन देता का जमीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड ‌- गेल्या वीस वर्षांपूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड’ ओढयावर ...

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड ‌-

गेल्या वीस वर्षांपूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची

शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड’ ओढयावर आज लोंढा -नाला प्रकल्प

पूर्णत्वास येत आहे. किरकोळ कामे वगळता धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या काम बंद असले तरी गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरुवात केल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे, पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली अशा २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने 'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन ' असे म्हणत आर्त हाक देत आहेत.

केळोशी बु.(ता. राधानगरी) येथील बैलगोंड ओढयावर १९९७-९८मध्ये ५६०३.२२५ घनमीटर साठवण क्षमतेच्या मध्यम प्रकल्प उभारणीच्या कामास सुरुवात झाली.

प्रत्यक्षात काम दोन-तीन वर्षांनी सुरू झाले. पहिल्याच टप्प्यात

धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मोठा विरोध

केला होता. आमचे पुनर्वसन प्रथम करा व मगच जमिनीचा ताबा सोडला जाईल, असा

हट्ट या शेतकऱ्यांनी धरला होता, पण तडजोडीने गावचे कल्याण होते व गावच्या

शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय म्हणून या

शेतकऱ्यांनी हट्ट सोडत कसत असलेल्या जमिनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या व

कामास सुरुवात झाली.

या घटनेला आता जवळपास २०

वर्षे लोटली. संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या जमिनीच्या बदल्यात

जमिनी देऊ करा म्हणून या वीस वर्षांत किती हेलपाटे शासनदरबारी मारले याला

गणितच नाही. गेल्या चार वर्षांपासून तर या प्रकल्पातील पाणी अडवले असून अडवलेल्या पाण्याचा काठावरील व शिवारातील शेतकरी पुरेपूर वापर करत आहेत. त्यांची शेती हिरवाईने नटली आहे, पण ज्या लोकांनी हे धरण व्हावे म्हणून

स्वतःची शेतीवाडी या धरणासाठी बहाल केली ते शेतकरी मात्र अद्यापही

उपेक्षितच आहेत. त्यांना ना योग्य मोबदला दिला गेला ना जमीन ! त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आर्त टाहो फोडत आम्हाला कोणी जमीन देता का जमीन म्हणत

आपले गाऱ्हाणे 'लोकमत 'कडे मांडले आहे.

जमीन शिल्लक असताना चालढकल का?

धरण परिसरात सरकारी मालकीचे ७८५ , २४, ८१२, ८२०, ९०५, ८८०, ८३८ इतके गट नंबर असून या गटात जवळपास ७० एकर जमीन शिल्लक असताना व शेतकऱ्यांनी या

गटाचा पसंतीक्रम दिला असताना प्रशासन का चालढकल करते आहे याचे उत्तर

प्रशासनानेच द्यावे.