शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:21 IST

कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय? असा प्रश्न पडल्याचा टोला ...

कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय? असा प्रश्न पडल्याचा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी सायंकाळी येथे लगावला. त्याचबरोबर भाजप सरकार हे सूडभावनेतून सीआयडी, सीबीआय, ईडीच्या माध्यमातून छापे टाकून कॉँग्रेसच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ताराबाई पार्क येथील राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात २ व ३ एप्रिलच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.राज्याच्या अर्थमंत्र्यांनी १५ हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला; परंतु हे तुटीचे पैसे कशातून भरून काढणार हा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस पालकमंत्री पाटील यांचा मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडल्याचे दिसत आहे. त्यांना सल्ला आहे की, त्यांनी जरा सबुरीने घ्यावे; तसेच त्यांचा मधुमेह व रक्तदाब संतुलित राहावा, अशा गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.ते पुढे म्हणाले, हल्लाबोल आंदोलनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषद अध्यक्ष धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, असे राष्टÑवादीचे नेते येणार आहेत. कोल्हापुरातील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, तसेच सरकारवर नाराज असलेल्या कर्मचाºयांनाही निमंत्रित करावे. के. पी. पाटील म्हणाले, राष्टÑवादीचे हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी व आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करावी. मुश्रीफ हे फक्त कागलचे आमदार नसून जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवसाला जिल्हाभरात लावलेले फलक हल्लाबोल आंदोलनापर्यंत कायम ठेवावेत.ए. वाय. पाटील म्हणाले, चार वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराने सर्व घटक नाराज आहेत. ते हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून मांडायचे आहे. यावेळी उपमहापौर सुनील पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहराध्यक्ष राजेश लाटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, माजी महापौर आर. के. पोवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, आदी उपस्थित होते.वाढदिवसासाठी खिशात हात घालावाजिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:च्या खिशात हात घालून आपल्या परीने साजरा करावा, त्यासाठी वर्गणी गोळा करून गालबोट लावू नये, असे लाटकर यांनी सांगितले.हळदीच्या पडझडीची काळजी नाहीहळदी (ता. करवीर) येथे राष्टÑवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा रविवारी सायंकाळी भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होता. हा धागा पकडत हळदीत काही पडझड झाली असली तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही; कारण करवींर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनासाठी येणार आहेत व आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडीची शर्यत आयोजित केल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.जिल्हा बॅँकांच्या बरखास्तीची भाषाजिल्हा बॅँकांनी यापूर्वी सेवा संस्थांकडून व्याज वसूल केले आहे; परंतु सरकारकडून पुन्हा हे व्याज घ्यावे, असे जिल्हा बॅँकांना सांगितले आहे. हे शक्य नसल्याचे सांगायला गेल्यावर सरकारकडून बॅँका बरखास्तीची भाषा केली जात असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.