शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लोकांचे जोडे आम्ही खायचे का ?

By admin | Updated: October 22, 2015 00:51 IST

सभापतींचा सवाल : ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची, अधिकाऱ्यांनी मजा मारायची

आजरा : आजरा तालुक्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी साठेल याची शाश्वती नाही. ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन मजा मारायची आणि तालुक्यातील लोकांचे जोडे आम्ही खायचे, असा प्रकार सुरू असून पाणीटंचाइच्या पार्श्वभूमीवर बेफिकीरपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत सभापती विष्णूपंत केसरकर यांनी जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.आजरा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त गावातील पाणीसाठ्याची व आवश्यक उपाययोजनेच्या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील मलिग्रे येथील पाझर तलावाची गळती, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची झालेली दुरवस्था याबाबत जोरदार चर्चा झाली. वारंवार बैठका घेऊनही जलसंधारणाचे अधिकारी कोणत्याच बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल खदखदणाऱ्या रागाचा अखेर सभापती केसरकर यांच्याकडून उद्रेक झाला.मलिग्रे तलावाच्या बांधकामाचे काम लाखो रुपये खर्चून करण्यात आले; पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम झाल्याने तलावात पाणीसाठा होत नाही. यामुळे मलिग्रे परिसरातील गावांचे पाण्याविना प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी घालतात. पाण्याचा पत्ता नाही. कंत्राटदार पैसे मिळवून रिकामे झाले. अधिकारी काय करतात? चांगली कामे का होत नाहीत? पैसे काय झाडाला लागतात का? असा प्रश्न उपस्थित करीत कंत्राटदारांना पोसणे बंद करा, असा सल्ला दिला.तालुक्यात पाणीसाठा करता येणे शक्य आहे. पण, बंधाऱ्यांकरिता वापरले जाणारे बरगे सडले आहेत. कारणे सांगत बसू नका तर बरग्यांसाठी प्रयत्न करा, असेही सांगितले. पाणीटंचाई प्रश्नाबाबत हलगर्जीपणा केल्याची तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्र ार करण्याचा इशाराही केसरकर यांनी दिला.चर्चेत कॉ. संपत देसाई, उपसभापती दीपक देसाई, जलसंधारणचे सहायक अभियंता एस. व्ही. दावणे यांच्यासह उपस्थितांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)पुन्हा अधिकारी गायबआजची बैठक पूर्व नियोजित असूनही गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी पुन्हा एकवेळ दांडी मारली. सभा सुरू झाल्यानंतर तासाभराने गटविकास अधिकारी आले. तर इतर अधिकारी नेहमीप्रमाणे भागात होते.सोहाळे बंधारा पैसेच नाहीतसोहाळे बंधाऱ्याच्या ठेकेदाराने सुमारे ३२ लाख रुपये खर्चून बऱ्यापैकी दुरुस्ती केली आहे; पण बिलेच न निघाल्याने पुढची कामे केलेली नाहीत. हा प्रकारही चिंताजनक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.