शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

लोकांचे जोडे आम्ही खायचे का ?

By admin | Updated: October 22, 2015 00:51 IST

सभापतींचा सवाल : ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची, अधिकाऱ्यांनी मजा मारायची

आजरा : आजरा तालुक्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी साठेल याची शाश्वती नाही. ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन मजा मारायची आणि तालुक्यातील लोकांचे जोडे आम्ही खायचे, असा प्रकार सुरू असून पाणीटंचाइच्या पार्श्वभूमीवर बेफिकीरपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत सभापती विष्णूपंत केसरकर यांनी जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.आजरा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त गावातील पाणीसाठ्याची व आवश्यक उपाययोजनेच्या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील मलिग्रे येथील पाझर तलावाची गळती, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची झालेली दुरवस्था याबाबत जोरदार चर्चा झाली. वारंवार बैठका घेऊनही जलसंधारणाचे अधिकारी कोणत्याच बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल खदखदणाऱ्या रागाचा अखेर सभापती केसरकर यांच्याकडून उद्रेक झाला.मलिग्रे तलावाच्या बांधकामाचे काम लाखो रुपये खर्चून करण्यात आले; पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम झाल्याने तलावात पाणीसाठा होत नाही. यामुळे मलिग्रे परिसरातील गावांचे पाण्याविना प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी घालतात. पाण्याचा पत्ता नाही. कंत्राटदार पैसे मिळवून रिकामे झाले. अधिकारी काय करतात? चांगली कामे का होत नाहीत? पैसे काय झाडाला लागतात का? असा प्रश्न उपस्थित करीत कंत्राटदारांना पोसणे बंद करा, असा सल्ला दिला.तालुक्यात पाणीसाठा करता येणे शक्य आहे. पण, बंधाऱ्यांकरिता वापरले जाणारे बरगे सडले आहेत. कारणे सांगत बसू नका तर बरग्यांसाठी प्रयत्न करा, असेही सांगितले. पाणीटंचाई प्रश्नाबाबत हलगर्जीपणा केल्याची तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्र ार करण्याचा इशाराही केसरकर यांनी दिला.चर्चेत कॉ. संपत देसाई, उपसभापती दीपक देसाई, जलसंधारणचे सहायक अभियंता एस. व्ही. दावणे यांच्यासह उपस्थितांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)पुन्हा अधिकारी गायबआजची बैठक पूर्व नियोजित असूनही गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी पुन्हा एकवेळ दांडी मारली. सभा सुरू झाल्यानंतर तासाभराने गटविकास अधिकारी आले. तर इतर अधिकारी नेहमीप्रमाणे भागात होते.सोहाळे बंधारा पैसेच नाहीतसोहाळे बंधाऱ्याच्या ठेकेदाराने सुमारे ३२ लाख रुपये खर्चून बऱ्यापैकी दुरुस्ती केली आहे; पण बिलेच न निघाल्याने पुढची कामे केलेली नाहीत. हा प्रकारही चिंताजनक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.