शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

पाणीपुरवठा आता रोज करा

By admin | Updated: August 11, 2016 00:32 IST

नगरसेवकांची मागणी : २० आॅगस्टच्या सभेत निर्णय

कोल्हापूर : राधानगरी धरणातील पाणीसाठा संपल्यानंतर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला म्हणून पाणीवाटपाचे नियोजन टंचाईच्या काळातही चांगल्या पद्धतीने झाले; परंतु आता चांगला पाऊस झाला, धरणही भरलेले आहे. त्यामुळे पूर्ववत रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे आली असून, येत्या २० आॅगस्टला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा चांगला पाऊस झाला असून, राधानगरी धरण पूर्णपणे भरले आहे. काळम्मावाडी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. पंचगंगा नदीलाही आता पूर आला आहे. त्यामुळे शहरात रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे येत आहे. बहुसंख्य नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी महापौर अश्विनी रामाणे यांची भेट घेऊन रोज पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनास आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. बुधवारी महापौर रामाणे यांनी जलअभियंता मनीष पवार यांच्याशी या विषयावर चर्चा करून माहिती घेतली. सध्या पाणी आहे, त्यामुुळे प्रशासनास काही अडचणी नसल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. तरीही महापौरांनी यावर येत्या महासभेत चर्चा करून, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन निर्णय घेऊ, असे सांगितले. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आता २० आॅगस्टनंतर केव्हाही रोज पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले. त्याला कोल्हापूर शहरवासीयांनीही प्रतिसाद देत सहकार्य केले. पाणीपुरवठा विभागाने योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे टंचाईच्या काळातसुद्धा शहरवासीयांना टंचाईच्या झळा बसल्या नाहीत किंवा पाण्यासाठी धावाधाव करावी लागली नाही. गेल्या चार-साडेचार महिन्यांत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे चांगले परिणाम दिसून आले. पण गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी नगरसेवकांतून केली जाऊ लागली आहे. टंचाईच्या काळात शहरवासीयांनी प्रशासनास सहकार्य केले; पण आता पाणी असताना त्यांना वेठीला धरणे योग्य नाही, असा नगरसेवकांचा आग्रह आहे. पुढे जानेवारी ते मार्च या काळात परिस्थिती पाहून पुन्हा नियोजन बदलता येईल, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे. महासभेतील निर्णय काय होतो यावर प्रशासन नियोजन ठरविणार आहे. (प्रतिनिधी)६८ लाखांची झाली बचत!एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण महानगरपालिकेच्या चांगलेच पथ्यावर पडले. राधानगरी धरण आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना शहरातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि मुबलक पाणी तर मिळालेच; शिवाय उपसा कमी केल्यामुळे विजेच्या खर्चात बचत झाली. कायमच दिवसाआड पुरवठा करा..दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे लोकांना पाणी जपून वापरण्याची सवय झाली आहे. लोकांना सध्या चांगल्या पद्धतीने पुरेसे पाणी मिळत आहे. काही अपार्टमेंटस वगळता इतरांची त्याबद्दल काहीच तक्रार नाही. त्यामुळे सध्याची व्यवस्थाच कायम ठेवावी, अशीही बहुतांशी शहरवासियांची मागणी आहे.