शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पाणीपुरवठा आता रोज करा

By admin | Updated: August 11, 2016 00:32 IST

नगरसेवकांची मागणी : २० आॅगस्टच्या सभेत निर्णय

कोल्हापूर : राधानगरी धरणातील पाणीसाठा संपल्यानंतर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला म्हणून पाणीवाटपाचे नियोजन टंचाईच्या काळातही चांगल्या पद्धतीने झाले; परंतु आता चांगला पाऊस झाला, धरणही भरलेले आहे. त्यामुळे पूर्ववत रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे आली असून, येत्या २० आॅगस्टला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा चांगला पाऊस झाला असून, राधानगरी धरण पूर्णपणे भरले आहे. काळम्मावाडी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. पंचगंगा नदीलाही आता पूर आला आहे. त्यामुळे शहरात रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे येत आहे. बहुसंख्य नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी महापौर अश्विनी रामाणे यांची भेट घेऊन रोज पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनास आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. बुधवारी महापौर रामाणे यांनी जलअभियंता मनीष पवार यांच्याशी या विषयावर चर्चा करून माहिती घेतली. सध्या पाणी आहे, त्यामुुळे प्रशासनास काही अडचणी नसल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. तरीही महापौरांनी यावर येत्या महासभेत चर्चा करून, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन निर्णय घेऊ, असे सांगितले. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आता २० आॅगस्टनंतर केव्हाही रोज पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले. त्याला कोल्हापूर शहरवासीयांनीही प्रतिसाद देत सहकार्य केले. पाणीपुरवठा विभागाने योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे टंचाईच्या काळातसुद्धा शहरवासीयांना टंचाईच्या झळा बसल्या नाहीत किंवा पाण्यासाठी धावाधाव करावी लागली नाही. गेल्या चार-साडेचार महिन्यांत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे चांगले परिणाम दिसून आले. पण गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी नगरसेवकांतून केली जाऊ लागली आहे. टंचाईच्या काळात शहरवासीयांनी प्रशासनास सहकार्य केले; पण आता पाणी असताना त्यांना वेठीला धरणे योग्य नाही, असा नगरसेवकांचा आग्रह आहे. पुढे जानेवारी ते मार्च या काळात परिस्थिती पाहून पुन्हा नियोजन बदलता येईल, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे. महासभेतील निर्णय काय होतो यावर प्रशासन नियोजन ठरविणार आहे. (प्रतिनिधी)६८ लाखांची झाली बचत!एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण महानगरपालिकेच्या चांगलेच पथ्यावर पडले. राधानगरी धरण आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना शहरातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि मुबलक पाणी तर मिळालेच; शिवाय उपसा कमी केल्यामुळे विजेच्या खर्चात बचत झाली. कायमच दिवसाआड पुरवठा करा..दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे लोकांना पाणी जपून वापरण्याची सवय झाली आहे. लोकांना सध्या चांगल्या पद्धतीने पुरेसे पाणी मिळत आहे. काही अपार्टमेंटस वगळता इतरांची त्याबद्दल काहीच तक्रार नाही. त्यामुळे सध्याची व्यवस्थाच कायम ठेवावी, अशीही बहुतांशी शहरवासियांची मागणी आहे.