शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 12:49 IST

आजपासून स्थलांतर सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील पावसाचा जोर असाच राहिला तर राधानगरी, कुंभी, कासारी या तीन धरणातील पाण्याचा विसर्ग आज मंगळवारी सुरू होऊन पूर येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे अजून २४ तास आणि याआधीच्या दोन पुरांचा अनुभव आहे, त्यामुळे विसर्ग सुरू झाल्यावर लोकांच्या दारात पूर येईपर्यंत वाट न बघता तातडीने आज, मंगळवारपासूनच नागरिकांचे स्थलांतर करा.

यंदा कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे बोटीतून स्थलांतर होणार नाही. बोटी फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जातील.. अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी सोमवारी कोल्हापूरसह जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी या पूरबाधित होणाऱ्या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, आज मंगळवारी सायंकाळपर्यंत राधानगरीतील व त्यानंतर एका दिवसाने कुंभी कासारीतून विसर्ग सुरू होईल. यामुळे किमान ५ फुटांनी पाणी वाढून धोका पातळी ओलांडेल. आयत्या वेळी बोटीतून स्थलांतर करणे त्रासाचे होते व लोकांच्या जीवाला धोका असतो. जनावरांचा मृत्यू होतो. तशी वेळ येऊ नये यासाठी सोमवारी रात्रीपर्यंत पाणी खाली गेले नाही तर मंगळवारी स्थलांतर सुरू करा.

स्थलांतरासाठी बोटींचा वापर होणार नाही. नागरिकांची खासगी वाहने असतील. एसटी बसेसमधून स्थलांतर करा. त्यासाठी ठिकाणानुसार जबाबदारी निश्चित करा. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर काेल्हापुरात पाणी यायला किमान १८ तास लागतील, पण त्या अलीकडे असलेल्या भागाची काळजी घ्या. अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी कायम संपर्कात राहा.अलर्ट करायला आलो आहे..पालकमंत्री म्हणाले, कोल्हापुरात अजून पूरजन्य स्थिती नसली तरी मी तुम्हाला अलर्ट करायला आलो आहे. धरणातील विसर्ग सुरू झाल्यावर पाण्याची पातळी कोणत्यावेळी, किती वाढते, याची तुम्हाला माहिती आहे. विसर्ग सुरू झाला की किमान १० हजार क्युसेस पाणी नदीत वाढणार. रस्ते बंद होणार, पाणी वाढणार आणि लोक पुरात अडकून पडणार, जेवढा वेळ ते अडकून राहतील तेवढा यंत्रणेवरील ताण वाढेल.

पूर ओसरताच पंचनामे करा..पूर ओसरला की लगेच शेतीचे पंचनामे सुरू करा. विहिरींमध्ये गेलेल्या पुराच्या पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा तयार ठेवा. स्थलांतराच्या ठिकाणी डॉक्टर व औषधांचे साठा तयार ठेवा. नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, जेवणाची सोय करा. जनावरांसाठी चारा तयार ठेवा. सर्व विभागांनी समन्वयाने काम करा, मी म्हणजे तुम्ही आहात असे समजून यंत्रणा राबवा असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरDipak Kesarkarदीपक केसरकर