शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

अवैध बांधकामांवर कारवाई नको : महाडिक- पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:12 IST

कोल्हापूर : बहुचर्चित तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांच्या बांधकामांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारवाईपासून संरक्षण व न्याय द्यावा, अशी मागणी ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना

ठळक मुद्देतावडे हॉटेल परिसरातील मिळकतींना महापालिकेच्या कारवाईपासून संरक्षणाची मागणी

कोल्हापूर : बहुचर्चित तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांच्या बांधकामांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारवाईपासून संरक्षण व न्याय द्यावा, अशी मागणी ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. मुंबई येथे विधिमंडळ अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हे निवेदन देण्यात आले.

तावडे हॉटेल परिसरातील २५० एकर जागेची मालकी कोल्हापूर महानगरपालिकेची असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ज्या अवैध इमारती उभ्या राहिल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सुरू केली असतानाच आमदार महाडिक यांनी पालकमंत्र्यांकडे अशाप्रकारचे निवेदन दिल्यामुळे अवैध बांधकामावरील कारवाईबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या जागेत अनेकांना उचगांव ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन इमारती बांधल्या आहेत, एवढेच नाही तर नियमही धाब्यावर बसवून बांधकामे केली आहेत. जागेची मालकी स्पष्ट झाल्यामुळे ज्यांनी बांधकामे केली आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्यापैकी काहींनी आमदार महाडिक यांची भेट घेऊन महापालिकेची संभाव्य कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यावेळी आमदार महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन तसे निवेदन दिले. या निवेदनासोबत उचगांव ग्रामपंचायतीचे निवेदनही जोडण्यात आले आहे.

उचगांव ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी दिलेल्या नागरिकांचे बांधकाम हे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील गट क्रमांकमध्ये असतील तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता स्थानिक नागरिकांच्या मिळकती जसे आहे तसेच महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, असे निवेदनात आमदार महाडिक यांनी म्हटले आहे.सुमारे २५० एकर जमीन महापालिकेच्या मालकीची असतानाही उचगांव ग्रामपंचायतीने बांधकाम परवाने दिले. या जागेपैकी १७ एकर जागा ही कचरा डेपो आणि ट्रक टर्मिनससाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे तरीही अशा आरक्षित जागेवर बांधकामे झाली आहेत. ही बांधकामे नियमानुसार अवैध ठरत असून त्यांच्यावर कारवाई करण्याकरीता महापालिकेने अशा बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. अशावेळी आमदार महाडिक यांनी पालकमंत्र्यांनी निवेदन दिले असल्याने राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.मिळकतधारकांचे नुकसान होऊ नये म्हणूनउचगांव ग्रामपंचायतीने या मिळकतींना परवानगी दिली आहे. मात्र, आता उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार या मिळकती महापालिकेच्या हद्दीत गेल्या आहेत. त्यामुळे यात मिळकतधारकांचे नुकसान होऊ नये यासाठी मी पालकमंत्र्यांना या मिळकतींना महापालिकेच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची विनंती केली आहे.