शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

पैसा कमविताना माणुसकी हरवू नये

By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST

मधुकर पाटील : श्री महालक्ष्मी भक्त मंडळ व्याख्यानमाला

कोल्हापूर : जोपर्यंत आपल्या घरात, कुटुंबात, आपल्या आजूबाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं, तोपर्यंत माणसाचे आपला- तुपला, सख्खा - परका, गरीब -श्रीमंत असे जास्तीचे चोचले असतात; पण खरी वेळ आली की यातले काहीही कामी येत नाही, कामी येते ती फक्त माणुसकीच. त्यामुळे माणसुकी जपा आणि टिकवा, असे आवाहन प्रा. मधुकर पाटील यांनी केले. करवीरनगर वाचन मंदिर येथे रविवारी सायंकाळी श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘माणुसकी हरवलेला समाज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ जोशी होते. पाटील म्हणाले, माणुसकी, नातेसंबंध, मैत्री या गोष्टी आता केवळ चित्रपट, कथाकादंबऱ्यांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत, असे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. कारण माणूस माणुसकी विसरत चालला असल्याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येतो. नात्यांकडे पाहायला माणसे तयार नाहीत. सोशल नेटवर्किंगच्या युगात माणसांमधला संवाद कमी होत चालला आहे. संवादाच्या माध्यमाने क्रांती केली; मात्र एखाद्यावेळी रस्त्यावर अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना मदतीला धाऊन न जाता, अपघाताचा फोटो पहिला कोण काढतो, यामध्येच आजच्या पिढीला धन्यता वाटते. पुढे पाटील म्हणाले, आज जगात माणसाची मूलभूत गरज अन्न, हवा आणि पाणी राहिली नसून, पैसा ही बनली आहे. पैशांपेक्षा श्रेष्ठ आणि मौल्यवान गोष्टी या जगात अनेक असून, त्यातील एक म्हणजे माणुसकी होय. पैसा मिळविण्याच्या नादात आपण स्वत:ची कर्तव्ये, सामाजिक जाणीव विसरत चाललो आहे. आपल्या घरात आपली काही माणसे राहतात याचे भानच आपल्याला उरले नाही. या गोष्टींमुळे आपली नाती तुटत चालली आहेत. माणसांनी पैसा कमवू नये असे नाही, जरूर कमवावा; मात्र पैसा कमविताना माणसुकी हरवू नये. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह राजू मेवेकरी यांनी स्वागत केले, तर नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. हीरकमहोत्सवी समितीचे गजानन नार्वेकर यांनी आभार मानले. राजेंद्र झुरळे, अनिल जाधव, दिनेश माळकर, संजय बावडेकर, ऋचा कुलकर्णी, किरण धर्माधिकारी, शिरीष कणेकर, ज्योती जाधव, शरद गोसावी, आदी उपस्थित होते.