शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पैसा कमविताना माणुसकी हरवू नये

By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST

मधुकर पाटील : श्री महालक्ष्मी भक्त मंडळ व्याख्यानमाला

कोल्हापूर : जोपर्यंत आपल्या घरात, कुटुंबात, आपल्या आजूबाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं, तोपर्यंत माणसाचे आपला- तुपला, सख्खा - परका, गरीब -श्रीमंत असे जास्तीचे चोचले असतात; पण खरी वेळ आली की यातले काहीही कामी येत नाही, कामी येते ती फक्त माणुसकीच. त्यामुळे माणसुकी जपा आणि टिकवा, असे आवाहन प्रा. मधुकर पाटील यांनी केले. करवीरनगर वाचन मंदिर येथे रविवारी सायंकाळी श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘माणुसकी हरवलेला समाज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ जोशी होते. पाटील म्हणाले, माणुसकी, नातेसंबंध, मैत्री या गोष्टी आता केवळ चित्रपट, कथाकादंबऱ्यांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत, असे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. कारण माणूस माणुसकी विसरत चालला असल्याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येतो. नात्यांकडे पाहायला माणसे तयार नाहीत. सोशल नेटवर्किंगच्या युगात माणसांमधला संवाद कमी होत चालला आहे. संवादाच्या माध्यमाने क्रांती केली; मात्र एखाद्यावेळी रस्त्यावर अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना मदतीला धाऊन न जाता, अपघाताचा फोटो पहिला कोण काढतो, यामध्येच आजच्या पिढीला धन्यता वाटते. पुढे पाटील म्हणाले, आज जगात माणसाची मूलभूत गरज अन्न, हवा आणि पाणी राहिली नसून, पैसा ही बनली आहे. पैशांपेक्षा श्रेष्ठ आणि मौल्यवान गोष्टी या जगात अनेक असून, त्यातील एक म्हणजे माणुसकी होय. पैसा मिळविण्याच्या नादात आपण स्वत:ची कर्तव्ये, सामाजिक जाणीव विसरत चाललो आहे. आपल्या घरात आपली काही माणसे राहतात याचे भानच आपल्याला उरले नाही. या गोष्टींमुळे आपली नाती तुटत चालली आहेत. माणसांनी पैसा कमवू नये असे नाही, जरूर कमवावा; मात्र पैसा कमविताना माणसुकी हरवू नये. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह राजू मेवेकरी यांनी स्वागत केले, तर नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. हीरकमहोत्सवी समितीचे गजानन नार्वेकर यांनी आभार मानले. राजेंद्र झुरळे, अनिल जाधव, दिनेश माळकर, संजय बावडेकर, ऋचा कुलकर्णी, किरण धर्माधिकारी, शिरीष कणेकर, ज्योती जाधव, शरद गोसावी, आदी उपस्थित होते.