शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

टोल लावू देणार नाही

By admin | Updated: August 7, 2015 23:32 IST

चंद्रकांतदादा पाटील : टोलविरोधी कृती समितीला ग्वाही

सांगली : सांगली बायपास रस्त्यावर पुन्हा टोल सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी टोलविरोधी कृती समितीला दिली. दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात आज, शनिवारी उच्च न्यायालयात अपील दाखल केले जाणार आहे. न्यायालयीन लढाईसाठी शासनाकडून ज्येष्ठ वकील दिला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर विश्रामगृहात निवेदन दिले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, उपमहापौर प्रशांत पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, मदनभाऊ युवा मंचचे सतीश साखळकर, सागर घोडके, शिवसेनेचे बजरंग पाटील, वाहतूकदार संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी उपस्थित होते. शिष्टमंडळाने टोलप्रश्नी भूमिका मांडली. कृती समितीच्या दणक्यानंतर वर्षापूर्वी सांगलीतील टोल वसुली बंद झाली होती. ठेकेदाराने जादा कामाच्या रक्कम वसुलीसाठी न्यायालयात धाव घेतली; पण सार्वजनिक बांधकाम (पान १ वरून)विभागाच्या कचखाऊ भूमिकेमुळे न्यायालयात योग्य बाजू मांडली गेली नाही. त्यामुळेच पुन्हा १६ वर्षे टोलचे भूत सांगलीकरांच्या मानगुटीवर बसणार आहे. कंपनीने केलेले जादा काम मूळ करारात समाविष्ट नव्हते. त्या कामासाठी लावलेला २४ टक्के व्याजदरही चुकीचा आहे. बायपास रस्त्याच्या मूळ कामाची किंमत ४ कोटी ५३ लाख होती, पण निविदा ७ कोटी ५० लाखांना देण्यात आली. त्यासाठी १६ वर्षे टोलवसुलीची मुदत दिली गेली. आता १ कोटी २० लाख रुपयांसाठी आणखी १६ वर्षे ९ महिने टोल वसूल होणार आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून हा टोलनाका पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच बांधकाम विभागाच्या कारभाराची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत सांगलीत टोलवसुली सुरू होणार नाही. शासनाच्यावतीने शनिवारीच उच्च न्यायालयात अपील दाखल केले जाईल. राज्यात भाजप सरकारने ६५ टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यात सांगलीचा समावेश नव्हता. आता नव्याने दहा टोलनाके बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात सांगलीचा समावेश केला जाईल. न्यायालयीन लढाईसाठीही शासनाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करू. आतापर्यंत चार ठिकाणच्या टोलप्रश्नी ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली होती, पण ते निकाल शासनाच्या बाजूने लागले आहेत. सांगलीबाबतही न्यायालयाकडून निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरकारी वकील सी. डी. माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. डी. शेजाळे, शिवसेनेचे अनिल शेटे, महेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे नितीन चव्हाण, राष्ट्रवादीचे मनोज भिसे, उमेश देशमुख, भाजपच्या नगरसेविका स्वरदा केळकर, मनसेचे आशिष कोरी, राजू ऐवळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नटोल ठेकेदार अशोका बिल्डकॉन कंपनीने येत्या सोमवारपासून टोलवसुली सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांनी बांधकाम व पोलीस विभागाला पत्र देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यात आता कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिल्याने सांगलीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत शिष्टमंडळाने चंद्रकांत पाटील यांना विनंती केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.भरपाईचा प्रस्तावअशोक बिल्डकॉन कंपनीने एक कोटी २० लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चापोटी टोलवसुली सुरू करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ठेकेदाराची रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरपाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या; पण या प्रक्रियेस सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत सांगलीकरांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे शनिवारी दाखल होणाऱ्या अपिलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.