शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

शेतकऱ्यांना निराधार करू नका

By admin | Updated: July 24, 2016 01:02 IST

‘एन. डी. पाटील यांचा सदाभाऊंना सल्ला : समित्यांसह शहरात ‘शेतकरी कट्टा’

 कोल्हापूर : नियमन मुक्तीचा निर्णय घेतला; पण बाजार समित्यांमध्ये माल लावायचा कोठे? या समस्येमुळे शेतकरी गोंधळला असून, त्याला निराधार करू नका. जरा नजर ठेवा, समित्यांमधील मोकळ्या जागा मालासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्ला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला. ही अडचण सरकारच्या लक्षात आली असून, समित्यांसह शहरातील जागा अधिगृहीत करून त्या शेतकरी कट्ट्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे खोत यांनी सांगितले. राज्यमंत्री खोत यांनी शनिवारी सायंकाळी प्रा. पाटील यांच्या रुईकर कॉलनी येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये बाजार समिती, शेतकरी, व्यापारी व सरकारची भूमिका यांवर सविस्तर चर्चा झाली. फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याबद्दल सरकारचे कौतुक करीत प्रा. पाटील म्हणाले, आता सरकारची जबाबदारी वाढली असून नवीन वाटेवरून जाताना शेतकरी गोंधळला आहे. समितीमध्ये माल लावायचा कोठे? विकायचा कसा? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. यासाठी समित्यांमधील मोकळ्या जागा त्यांच्यासाठी राखीव करून द्या. इतर राज्यांतील समित्यांमध्ये कशी व्यवस्था आहे, याच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून, समित्यांमध्ये ‘शेतकरी कट्टा’ उभा करण्याचा मानस असल्याचे खोत यांनी सांगितले. मुंबईमधील सामाजिक, गृहनिर्माण संस्थांना शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी जागा देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यानुसार बोरीबंदर महापालिकेसह व मुंबई जिल्हा बॅँकेच्या ५३ शाखांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भगवान काटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेठरे धरणची सभा अन् उडदाचे ऊटेउभय नेत्यांची चर्चा रंगली असताना भाऊंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘बी. आर.’ मास्तरांच्या प्रचारासाठी आम्ही दोघे एकत्र होतो. डोंगर चढून रेठऱ्याकडे जाताना आमच्या आईने गूळ, शेंगा आणि उडदाचे ऊटे दिले होते. दाजी, तुम्हाला आठवते काय?’ असे भाऊंनी विचारले, यावर ‘उडदाच्या उट्याबरोबर वरण्याची भाजी ठरलेली असायची!’ असे हसत- हसत प्रा. पाटील यांनी उत्तर दिले. भीष्माचार्यांच्या दर्शनाने हत्तीचे बळप्रा. पाटील यांचे पाय धरून आशीर्वाद घेताना खोत म्हणाले, ‘दाजी हे चळवळींचे भीष्माचार्य आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे वाटत होते. आता त्यांच्या दर्शनाने सरकारमध्ये काम करताना हत्तीचे बळ येणार आहे. पण दाजी, तब्येतीकडे लक्ष द्या आणि असाच आशीर्वाद कायम ठेवा.’