शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित करू नये

By admin | Updated: September 2, 2015 23:26 IST

हुपरीतील शासकीय जमीन : रौप्यनगरवासीय-शासन असा वाद उफाळून येण्याची शक्यता

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्यासमोर अगदी मोक्याच्या ठिकाणी असणारी गट नंबर ९२५/८ ‘अ’ ही कोट्यवधी रुपये किमतीची शासकीय जमीन, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित न करता शहरातील सार्वजनिक प्रयोजनासाठी व गोरगरीब गरजू, बेघर तसेच मागासवर्गीय कुटुंबांसाठीच राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर कांबळे व सामाजिक कार्यकर्ते उदय कंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, याबाबतचा ठरावही १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. परिणामी याप्रश्नी रौप्यनगरवासीय व शासन असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.निवेदनात म्हटले आहे, रौप्यनगरी हुपरी या निमशहरी गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराचा पारंपरिक चांदी व्यवसाय, साखर कारखाना, सूतगिरण्या, पंचतारांकित औद्योगिक वसाहतींच्या उभारणीमुळे परिसरामध्येही औद्योगिकीकरण झपाट्याने होत आहे. नजीकच्या काळामध्ये याठिकाणी नगरपरिषदेचीही उभारणी होणार आहे. परिणामी, भविष्यातील नागरी वसाहतींसाठी जमीन अपुरी पडण्याचा धोका संभवतो आहे. तसेच सार्वजनिक विकासासाठी जागेची मोठ्या प्रमाणात उणीव भासणार आहे. शहराचा चेहरा धारण केलेल्या रौप्यनगरीमध्ये सार्वजनिक एकही बाग, उद्यान नाही. तसेच भविष्यकाळामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचाही फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. भविष्यकाळातील या धोक्यांची जाणीव प्रशासनाने ठेवून सर्वांसाठी अत्यंत सोयीस्कर आणि शहरालगत उपलब्ध असणाऱ्या गट नंबर ९२५/८ ‘अ’ पैकी उपलब्ध असणारी ७ हेक्टर १७ आर ही सरकारी कब्जा असणारी जमीन धरणग्रस्तांसाठी आरक्षित करण्यात येऊ नये, अन्यथा रौप्यनगरीवासीयांचे फार मोठे नुकसान होण्याचा धोका संभवतो. (वार्ताहर)

दरम्यान, या जागेप्रश्नी १५ आॅगस्टला आयोजित ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही सरकारी जमीन संपादित करण्यात येऊ नये, असा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाचे सूचक आहेत विद्याधर कांबळे व अनुमोदक आहेत श्रीकांत प्रभाकर पोतदार. परिणामी, याप्रश्नी रौप्यनगरीवासीय व शासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.