शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

ऊस बिलातून पाणीपट्टी कपात नको

By admin | Updated: December 14, 2015 00:06 IST

शेतकऱ्यांची मागणी : परवानगीशिवाय परस्पर वसुलीवर आक्षेप

सावरवाडी : सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या रकमेची वसुली केली जाते. मात्र, बऱ्याचवेळा या शेतकऱ्यांकडून जादा पाणीपट्टी वसूल केली जाते. या प्रकारामळे शेतकरीवर्गात नाराजी पसरली असून, शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीच्या रकमा कपात करू नयेत, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व सहकारी विकास सेवा संस्था शेतकऱ्यांच्या पीककर्ज व पाणीपट्टीच्या रकमांच्या वसुलीसाठी साखर कारखान्याकडे वसुली पत्रक पाठविले जाते. या वसुली पत्रकातून जादा रकमा कळवून त्यांच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत. जादा रकमा कळवून भ्रष्टाचार होऊ लागला आहे. संस्थेच्या सचिवांच्या गैरकारभाराबाबत ऊस उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लेखी परवानगीशिवाय कोणत्याही सहकारी संस्थांच्या रकमेची कपात करू नये, अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत. पाणीपट्टी व कर्ज प्रकरण वसुलीतून जादा रकमा उचलून एकप्रकाराचा घोटाळाच होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यासाठीच सहकारी साखर कारखान्यांनी ऊस बिलांची रक्कम थेट सहकारी संस्थांना कपात करू देऊ नये, याचा साखर कारखान्यांनी निर्णय घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलातून जादा रक्कम उचल करण्याचा प्रकार घडू लागल्याने सहकारी संस्थांच्या कारभाराची चौकशी करण्याची गरज आहे. संस्था सचिवांनी शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय ऊस बिलातून कोणतीच कापत करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू.’’ - नामदेव पाटील, भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य.