शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

जिल्ह्याचा स्वाभिमान दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका!

By admin | Updated: April 22, 2015 00:25 IST

उदयनराजे गरजले : रामराजेेंच्या ‘बंद लखोटा’ परंपरेवर केली जहाल टीका

सातारा : सातारा जिल्ह्यातील मातीत प्रचंड ऊर्जा आहे. येथील जनता लोकप्रतिनिधींना आपल्या स्वाभिमानासाठी निवडून देते. आपला स्वाभिमान दुसऱ्या जिल्ह्याच्या दावणीला बांधण्यासाठी नाही, अशी जहाल टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केली. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व इतर मतदारसंघातील मतदारांची बैठक सायंकाळी उशीरा घेतली होती. या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘दुसऱ्याला बाजूला सारुन राजकारण करण्याची परंपरा अनेक दिवसांपासून रुढ होत चालली आहे. मला जिल्हा बँकेत निवडून जाऊन कोणताही लाभ घ्यायचा नाही. मला कर्ज काढण्याची गरज नाही. पण जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मला हे करावे लागत आहे. या प्रस्थापित मंडळींवर ‘चेक’ बसण्यासाठी जो उमेदवार योग्य असेल त्याला माझा पाठिंबा राहिल. लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा हक्क आहे. त्यामुळे नव्या मंडळींना संधी द्यावी, अशी माझी भूमिका सुरुवातीपासूनच राहिली आहे. मात्र, ‘त्यांना’ ती मान्य नाही. त्यामुळेच माझ्याविषयी त्यांना राग आहे.’गेल्या पाच वर्षांतील त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी त्यांना भीती होती, म्हणूनच बंद लखोट्यातून आलेले निर्णय माजी पालकमंत्री सांगत होते. हे बंद लखोट्यात काय लिहिलंय, हे मला दाखवा, असा माझा आग्रह होता. मात्र, त्यांना तो त्यांना मान्य नव्हता. या सर्वांना मान्य होतं की मी मनमानी कारभार चालू देणार नाही. त्यामुळेच मला जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीत घेतलं गेलं नाही. भांडल्याशिवाय काहीच मिळणार नाही, हे मला माहित झालं आहे. त्यामुळे रेल्वेचे दोन ट्रॅकसाठी साडेचार कोटी मंजूर करुन आणले. कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गासाठीही मी पाठपुरावा केला आहे. वर्षानुवर्षे खुर्चीला चिकटून बसणाऱ्यांनी काय केले आहे, असा सवालही उदयनराजेंनी यावेळी उपस्थित केला. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रवी साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अ‍ॅड. डी. जी. बनकर, सुनील काटकर, संभाजीराव पाटणे, पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत पडवळ, नाना शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मीच माझा पीए, ड्रायव्हर, क्लिनर..माझ्या आणि जनतेच्या मध्ये कोणी नाही. मीच माझा पीए, ड्रायव्हर आणि क्लिनरही आहे. त्यामुळे जे काही प्रश्न आहेत. ते न डगमगता माझ्यापर्यंत पोहचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. दबाव आणणाऱ्याचा योग्य ‘मान-पान’माझे नाव घेऊन सामान्य जनतेला वेठीस घेण्याचा प्रकार कोण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. मला भ्रष्टाचार बिलकूल खपत नाही. कोणी दबाव आणत असेल तर त्याचा योग्य मान, पान, सन्मान करुन त्याचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासनही उदयनराजेंनी उपस्थितांना दिले.