शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

हद्दवाढीचा वाद नको, तोडगा काढा

By admin | Updated: October 17, 2014 23:51 IST

कार्यशाळा : शहर आणि ग्रामीण अशा वादाऐवजी सामोपचाराची गरज

कोल्हापूर : एकीकडे हद्दवाढीमुळे ग्रामीण भागातील जनतेवर मोठा अन्याय होईल असे; तर दुसरीकडे हद्दवाढ झाल्यास शहराचा चौफेर विकास होणार असल्याचे चित्र सध्या रंगविले जात आहे. हद्दवाढीमुळे समाविष्ट होणाऱ्या गावांच्या भौगोलिक रचनेबरोबर सांस्कृतिक व सामाजिक ठेवणही लोप पावण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे, तर हद्दवाढ रखडल्याने शहराचा विकासही खुंटल्याची भावना शहरवासीयांत आहे. अशा परिस्थितीत ‘शहर व ग्रामीण’ असा वाद न करता सुसंवादाने विषयावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत महावीर महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत उमटले.शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत महावीर महाविद्यालयात ‘कोल्हापूर शहर : भौगोलिक अभ्यास’ या विषयावर कार्यशाळा गुरुवारी झाली. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. बी. कणसे होते. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहभागी मान्यवरांचे मतहद्दवाढीमुळे ग्रामीण जनतेवर अन्याय होईल, असा गैरसमज आहे. हद्दवाढीमुळे जास्त निधी उपलब्ध होणार आहे. हद्दवाढीमुळे शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणार आहे. समाविष्ट होणाऱ्या गावांना घेऊन जाण्याची हमी शहरवासीयांतर्फे देत आहे. तृप्ती माळवी- महापौर हद्दवाढ न झाल्याने शहराचा विकास खुंटला, हे साफ खोटे आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मोठा विकासनिधी मिळू शकलेला नाही. केंद्र व राज्य सरक ार यांनी संघर्षाशिवाय कोल्हापूरला काहीच दिलेले नाही. लोकसंख्येची अट शिथिल करण्यात राज्यकर्ते कमी पडले. -संपत पवार-पाटील, माजी आमदार शहराची नैसर्गिक व स्वाभाविक वाढ होण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दवाढीमुळे कृषिक्षेत्राचा नाश होईल, असे म्हणणाऱ्यांचेच अकृषिक किंवा बिगरशेती परवान्यासाठी सर्वाधिक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. हद्दवाढीमुळे ग्रामीण भागात आरोग्य, पाणी व रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा मिळतील.- अ‍ॅड. बाबा इंदुलकरउदारीकरणामुळे शहरकेंद्रित विकासाची संकल्पना पुढे आली आहे. शहर आणि भांडवलदार यांचा विकास हेच सरकारचे धोरण आहे. हद्दवाढ नफ्यासाठी की गरजेसाठी हा विचार करून सामोपचाराने तोडगा काढणे गरजेचे आहे.- कॉ. चंद्रकांत यादव