शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जुन्या रेखांकनाप्रमाणेच महामार्गाचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST

वडणगे : नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या नवीन रेखांकनामुळे करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, पडवळवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील कुशिरे या गावांतील शेतकऱ्यांची ...

वडणगे : नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या नवीन रेखांकनामुळे करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, पडवळवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील कुशिरे या गावांतील शेतकऱ्यांची पिकाऊ शेती, विहिरी, बोअरवेल, पाणीपुरवठा योजना व घरे उद्‌ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी १४ फेब्रुवारी २०१७ च्या जुन्या रेखांकनाप्रमाणे रस्त्याचे काम व्हावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या गावांतील शेतकऱ्यांनी दिला आहे. नवीन रेखांकनाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शंभरांवर शेतकरी उपस्थित होते. ४ जानेवारी २०२१ रोजी नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे नवीन रेखांकन करण्यात आले आहे. त्यामुळे या चार गावांतील ३५ विहिरी, २५ बोअरवेल, १०० घरे तसेच २५० एकर बागायत जमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आमचा रस्त्याच्या कामास विरोध नसून सध्याच्या नवीन रेखांकनास विरोध आहे, अशा तीव्र भावना या गावांतील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

नवीन रेखांकनाप्रमाणे केर्लीतील पाण्याचा स्रोत असणाऱ्या रस्त्याशेजारील दहा ते अकरा विहिरी व दोन-तीन बोअरवेल नष्ट होणार आहेत. त्यामुळे साठ ते सत्तर टक्के शेतकरी भूमीहीन होणार आहेत. संपूर्ण पिकाऊ जमीन महामार्गात जाणार असल्याने या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्याकरिता जुन्या रेखांकनाप्रमाणे महामार्गाचे काम केल्यास बहुतांशी जमिनी वाचणार आहेत. केर्ले, पडवळवाडी गावांची स्थितीही हीच आहे.

पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेचे याच मार्गातून पंपिंग स्टेशन, पाणीपुरवठ्याचे नळ आहेत. या संस्थेच्या योजनांमुळे येथील सुमारे पाचशे एकर जमीन ओलिताखाली येते. नवीन रेखांकनामुळे येथील शेतकऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीही यावेळी नवीन रेखांकनाला कडाडून विरोध केला.

शेतकऱ्यांचा विकासकामाला कोणताही विरोध नसून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मार्ग काढणे करणे गरजेचे आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बागायत जमिनीतून हा मार्ग करण्यापेक्षा डोंगराळ भागातूनच करावा, अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली.