शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

कोल्हापुरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने राज्य शासनाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग नियंत्रणात ...

कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने राज्य शासनाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नसल्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्याची शिफारस केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर प्रशासनाची पाठ थोपटून जाताना जिल्ह्याची स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिलेल्या समितीला तिथे गेल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचा साक्षात्कार झाला की काय, असा प्रश्न आता यंत्रणेलाही पडला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असून, रुग्णसंख्या हजाराच्या आत आल्याने संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यताही धूसरच आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होती. त्यामुळे मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य समितीने जिल्ह्याचा दौरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तीन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी जिल्हा-महापालिका प्रशासनाचे कौतुक करत कोल्हापूरची स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विधानाशी मी सहमत नसल्याचे सांगितले.

मागील आठवड्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असून, तो ९.८ टक्के इतका आहे. सध्या रुग्णसंख्या हजाराच्या आत आली आहे आणि मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा स्तर ३ मध्ये समावेश झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांनादेखील सोमवारपासून सकाळी ७ ते ४ या वेळेत व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. आता कुठे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणि व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना केंद्रीय समितीने कोल्हापूर व सांगलीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची शिफारस केल्याने पुन्हा लोकांच्या छातीत धस्स झाले. राज्याच्या आरोग्य विभागाने मात्र आम्हाला समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे.

---

महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, समितीने प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आणि काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. मात्र, त्यात लॉकडाऊनचा विषय चर्चेत आला नव्हता. महापालिका प्रशासनाकडे तसे कोणतेही अधिकृत निर्देश आलेले नाहीत.

----