शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

चौकटीत न राहता सर्वसमावेशक काम करा

By admin | Updated: December 10, 2014 00:30 IST

जयप्रकाश छाजेड : महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक

कोल्हापूर : आपण एका संघटनेचे पदाधिकारी आहोत, अशी चौकट स्वत:भोवती न बांधून घेता, यातून बाहेर पडून सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करा, आपोआप तुमच्या पाठीमागे लोक येतील. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता चळवळीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचा, असे आवाहन महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले. ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या हॉलमध्ये आज, मंगळवारी एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छाजेड म्हणाले, केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क संपविण्याचा डाव आखला आहे. तसेच नव्या वाहतूक विधेयकामुळे एस. टी. महामंडळाचे खासगीकरण होऊन एस.टी.चे अस्तित्व संपणार आहे; तर एस.टी.चे कर्मचारी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे या कायद्याविरोधात तुम्ही जनजागृती करणे गरजेचे आहे. या कायद्याविरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहा. या लढ्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये जनजागृती करा. तुम्ही एकत्र येऊन लढला तरच तुम्हाला न्याय मिळणार ही गोष्ट कामगारांना पटवून द्या. तसेच आगामी बँकेच्या निवडणुकीसाठी तयार रहा, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. बैठकीस राज्याचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोरे, सचिव डी. ए. लिपणे-पाटील, कोषाध्यक्ष सूर्याजी इंगळे, पुणेचे प्रादेशिक सचिव डी. पी. वनसोड, साताऱ्याचे विभागीय अध्यक्ष एस. के. भोसले, सिंधुदुर्ग प्रादेशिक सचिव एस. बी. रावराणे, एमएसईबी (इंटक)चे अध्यक्ष हिंदुराव पाटील, महाराष्ट्र राज्य इंटक विभागीय सचिव बंडोपंत वाडकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. बैठक सकाळी साडेअकरा वाजत सुरू होऊनसुद्धा काही पदाधिकारी उशिरा आले. यावेळी छाजेड यांचा पारा चढला. ‘बैठक किती वाजता होती, तुम्ही किती वाजता आला? आम्ही तुमच्याकरिता लढतो आहे. किती वाजता येण्यास सांगितले होते? तुमचे गाव जवळच आहे. तुम्ही दहा वाजता आले पाहिजे होते,’ असे म्हणताच उशिरा आलेल्या पदाधिकाऱ्यांचा चेहरा पडला. कोल्हापूरचे विभागीय सचिव बंडोपत यांनी, आपले कोल्हापूरचे विभागीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांचे आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांसह अन्य संघटनांतील कार्यकर्त्यांसोबत चांगलेच संबंध आहेत, असे सांगताच त्यांना मध्येच थांबवत छाजेड यांनी, ‘तुम्ही सगळ्यांनीसुद्धा ‘आप्पां’सारखेच बनले पाहिजे,’ असा सल्ला दिला.