शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

चौकटीत न राहता सर्वसमावेशक काम करा

By admin | Updated: December 10, 2014 00:30 IST

जयप्रकाश छाजेड : महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक

कोल्हापूर : आपण एका संघटनेचे पदाधिकारी आहोत, अशी चौकट स्वत:भोवती न बांधून घेता, यातून बाहेर पडून सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करा, आपोआप तुमच्या पाठीमागे लोक येतील. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता चळवळीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचा, असे आवाहन महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले. ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या हॉलमध्ये आज, मंगळवारी एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छाजेड म्हणाले, केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क संपविण्याचा डाव आखला आहे. तसेच नव्या वाहतूक विधेयकामुळे एस. टी. महामंडळाचे खासगीकरण होऊन एस.टी.चे अस्तित्व संपणार आहे; तर एस.टी.चे कर्मचारी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे या कायद्याविरोधात तुम्ही जनजागृती करणे गरजेचे आहे. या कायद्याविरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहा. या लढ्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये जनजागृती करा. तुम्ही एकत्र येऊन लढला तरच तुम्हाला न्याय मिळणार ही गोष्ट कामगारांना पटवून द्या. तसेच आगामी बँकेच्या निवडणुकीसाठी तयार रहा, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. बैठकीस राज्याचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोरे, सचिव डी. ए. लिपणे-पाटील, कोषाध्यक्ष सूर्याजी इंगळे, पुणेचे प्रादेशिक सचिव डी. पी. वनसोड, साताऱ्याचे विभागीय अध्यक्ष एस. के. भोसले, सिंधुदुर्ग प्रादेशिक सचिव एस. बी. रावराणे, एमएसईबी (इंटक)चे अध्यक्ष हिंदुराव पाटील, महाराष्ट्र राज्य इंटक विभागीय सचिव बंडोपंत वाडकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. बैठक सकाळी साडेअकरा वाजत सुरू होऊनसुद्धा काही पदाधिकारी उशिरा आले. यावेळी छाजेड यांचा पारा चढला. ‘बैठक किती वाजता होती, तुम्ही किती वाजता आला? आम्ही तुमच्याकरिता लढतो आहे. किती वाजता येण्यास सांगितले होते? तुमचे गाव जवळच आहे. तुम्ही दहा वाजता आले पाहिजे होते,’ असे म्हणताच उशिरा आलेल्या पदाधिकाऱ्यांचा चेहरा पडला. कोल्हापूरचे विभागीय सचिव बंडोपत यांनी, आपले कोल्हापूरचे विभागीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांचे आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांसह अन्य संघटनांतील कार्यकर्त्यांसोबत चांगलेच संबंध आहेत, असे सांगताच त्यांना मध्येच थांबवत छाजेड यांनी, ‘तुम्ही सगळ्यांनीसुद्धा ‘आप्पां’सारखेच बनले पाहिजे,’ असा सल्ला दिला.