शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विभागीय आयुक्तांनी उपाययोजना कराव्यात : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तसेच कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत असून, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तसेच कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत असून, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने कोल्हापुरात येऊन आढवा बैठक घेऊन उपचाराच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.

याबाबत पवार यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. ही गंभीर बाब आहे. लसीचा व रेमडेसिविरचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत, आम्ही समजू शकतो. परंतु, प्रशासकीय स्तरावर याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे, परंतु तसे होत नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहरामधील लसीकरणाच्या ठिकाणी होत असलेली प्रचंड गर्दी. यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे.

प्रशासकीय स्तरावर समन्वयाचा अभाव व काही प्रमाणात अनास्था या गोष्टींना कारणीभूत आहे. विभागीय आयुक्तांनी कोल्हापुरात तातडीची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, नाहीतर कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना जबाबदार कोण आहे, कोण नाही, त्यापेक्षा कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त कसा होईल याकडे सर्वांनी मिळून लक्ष द्यावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.