शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

जिल्ह्यात महसूल प्रशासन ठप्प

By admin | Updated: April 21, 2016 00:35 IST

कामानिमित्त आलेल्या लोकांची गैरसोय

कोल्हापूर : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या महिन्यात दुसऱ्यांदा महसूल कर्मचारी, तर तलाठी यांनी पहिल्यांदाच बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील महसूल प्रशासन दुसऱ्यांदा ठप्प झाले. सर्व महसूल कार्यालयांत अधिकारी कामावर, कर्मचारी आंदोलनात असे चित्र राहिले. यामुळे कामानिमित्त आलेल्या लोकांची गैरसोय झाली. तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा तलाठी संघातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून विविध माध्यमांतून आंदोलन केले जात आहे. १२ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन त्यांनी केले होते. आंदोलनाचा पाचवा टप्पा म्हणून तलाठी वगळता सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुरू असलेल्या तलाठी यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे सर्वच महसूल कामकाज बंद झाले. कार्यालये ओस पडली होती. अनेक कार्यालयांचे दार बंद करण्यात आले होते. यामुळे कामकाजावर परिणाम झाला. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यामहसूल कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या अशा : जुनी पेन्शन योजना लागू करावी, लिपिक पद रद्द करून ‘महसूल सहायक पद’ निर्माण करावे, निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, महसूल विभागाच्या नवीन योजना अंमलबजावणीसाठी स्वंतत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तालुक्यासाठी खनिकर्म निरीक्षकांची पदे निर्मित करावीत.तलाठ्याच्या मागण्या :सात-बारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात, हायस्पीड इंटरनेट सुविधा द्यावी, तलाठ्यांना सात-बारा, आठ अ देण्यासाठी प्रिंटर द्यावा, तलाठी कार्यालय सुसज्ज करावीत, पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अवैध गौणखनिज वसुलीतून तलाठ्यांना वगळावे, अंशदायी निवृत्तिवेतन योजना सुरू करावी, पदोन्नतीमध्ये द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेतील २५ टक्के कर्मचारी खात्यांतर्गत राखीव ठेवाव्यात. तलाठी २६ पासून बेमुदत संपावर..तलाठी आज, गुरुवारपासून संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार घालणार आहेत. २६ एप्रिलपासून तलाठी, मंडल अधिकारी बेमुदत संपावर जाणार आहेत. सकारात्मक चर्चा न झाल्यास १ मे रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर उपोषण करणार आहेत. ४महसूलच्या वाहनावर चालक नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वाहनातून कार्यालयात आले.