शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी सुट्टीदिवशी ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गतवर्षीसारखी कार्यपद्धती अवलंबण्यात ...

कोल्हापूर : एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गतवर्षीसारखी कार्यपद्धती अवलंबण्यात येत नसल्याबद्दल ‘लोकमत’ने मंगळवारी वस्तुस्थिती मांडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुट्टीदिवशीही ग्रामीण भागात धाव घेतली. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमकी काय प्रक्रिया करावी याबाबतही तातडीने सूचना करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर सॅनिटायझेशन करणे, दारावर स्टीकर लावणे, तातडीने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणे ही प्रक्रिया राबवण्यात येत होती. मात्र, आता या प्रक्रियेमध्ये शैथिल्य आल्याचे या वृत्तामध्ये मांडण्यात आले होते.

यानंतर सकाळीच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. याेगेश साळे यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून नेमके काय केले पाहिजे या सूचना दिल्या. तसेच त्यांनी मोरेवाडी, पाचगाव, आर. के. नगर, कळंबा, गोकुळ शिरगाव आदी गावांना भेटी दिल्या. या ठिकाणी गृह अलगीकरणामध्ये राहात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेट देऊन तेथे रुग्णाची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते याची चौकशी केली. तसेच सोबतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि ग्रामपंचायतीशी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

माता, बालआरोग्य संगेापन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनीही शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव, बांबवडे, सरूड गावांना भेटी दिल्या. या परिसरातील बहुतांशी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे माण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचीही माहिती घेतली.

चौकट

‘लोकमत’च्या बातमीनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिलेल्या सूचना

१ आपल्याकडील गृह अलगीकरणाच्या नागरिकांची काळजी घेतली का?

२ त्यांची दररोज दोनवेळा फोनद्वारे विचारणा करावी.

३ रुग्णांचा ताप आणि ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवावी.

४ दरवाजावर स्टीकर लावावे.

५ रुग्णाची काळजी घेणाऱ्यास मार्गदर्शन करावे.

६ रुग्णाकडे आवश्यक असा किट द्यावा.

७ अशा रुग्णाचे घर दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यास सांगावे.

८ रुग्णास स्वतंत्र खोली आणि अटॅच टॉयलेट असल्याची खात्री करावी.

९ प्रत्येक रुग्णाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः निरीक्षण करावे आणि त्याची नोंद ठेवावी.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्यच...

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, २४ तासांत त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला; परंतु मुंबई, पुण्याहून पुन्हा नागरिक गावकडे येऊ लागले आहेत. ग्रामसमित्या अजूनही म्हणाव्या तितक्या सक्रिय झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा धोका लक्षात घेऊनच कोरोना चाचणीचा निर्णय सक्तीचा केला होता व तो योग्यच होता, असे म्हणण्याची पाळी आता येणार आहे.

१३०४२०२१ कोल महापालिका

कोल्हापूर महापालिका गृह अलगीकरणमध्ये रुग्ण असलेल्या घरावर अशा पद्धतीने स्टीकर लावत असल्याची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.