शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

कर्नाटकात तिसऱ्या शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांचे ग्राम वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

राज्य सरकार व ग्रामीण भागातील नागरी समस्या सोडविण्यास आता कर्नाटकातील जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्राम वास्तव्य करावे लागणार ...

राज्य सरकार व ग्रामीण भागातील नागरी समस्या सोडविण्यास आता कर्नाटकातील जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्राम वास्तव्य करावे लागणार आहे.

ग्रामीण लोकांना जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयास कामाकरिता जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांचा 'चला गावाकडे' कार्यक्रम होणार आहे.

महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जिल्हाधिकारी एका ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. याबाबत संबंधित अधिकारी आठवड्यापूर्वीच तक्रार अर्ज स्वीकारतील.

सरकारी पेन्शन, स्शमानभूमी, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, मतदार यादी सुधारणा, पाणी समस्या, महापूर नुकसानभरपाई, आधारकार्ड आदी समस्यांचा विचार होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत प्रांत, सहाय्यक आयुक्त, तहसीलदार, महसूल निरीक्षक व तलाठी असा सरकारी लवाजमा उपस्थित राहणार आहेत. भेटीदरम्यान अधिकारीवर्गास गावातच मुक्काम करावा लागणार आहे.