शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

जिल्हाधिकारी धामणी खोऱ्यात संवाद साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:40 IST

म्हासुर्ली : जिल्हाधिकारी दौलत देसाई येत्या दोन ते तीन दिवसांत ते धामणी खोºयात येऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. ...

म्हासुर्ली : जिल्हाधिकारी दौलत देसाई येत्या दोन ते तीन दिवसांत ते धामणी खोºयात येऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असे कृती समितीने आज, गुरुवारी स्पष्ट केले. यावेळी समितीने रखडलेले प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासनाची मागणी केली. ती यावेळी मान्य करण्यात आली.धामणीवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृती समिती आणि प्रशासन यांच्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय धामणीवासीयांना विचारात घेऊन घेणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी दौलत देसाई हे स्वत: धामणी खोºयातील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन करणार आहेत.मात्र, गेले दोन ते अडीच महिने धामणीवासीयांचा हा बहिष्कार प्रशासनाने बेदखल केला होता. मात्र, धामणीवासीय आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर प्रशासनाला दखल घेणे भाग पडले आणि त्यातूनच गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात बहिष्काराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन करून यातील फायदे-तोटे समजून सांगितले. यावेळी कृती समितीने या प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याबाबत मागणी केली. ती प्रशासनाच्यावतीने मान्य करण्यात आली आहे. या बाबतची चर्चा सकारात्मक झाली असली तरी कृती समितीच्यावतीने याबाबतीत जिल्हाधिकारी देसाई यांनी आपली भूमिका धामणी खोºयात येऊन स्पष्ट करावी, अशी विनंती केली. ही विनंती जिल्हाधिकारी देसाई यांनी मान्य केली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत ते धामणी खोºयात येऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.यावेळी चर्चेसाठी प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह सचिन इथापे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, तसेच पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, सीआयडीच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील उपस्थित होत्या.