शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्हा बँकेचे तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एप्रिल २०२१ पासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एप्रिल २०२१ पासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. केंद्र सरकारच्या अपात्र कर्ज माफी रद्द केल्याने अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास संस्थांची व्याज आकारणी बंद करूच, त्याचबरोबर नाबार्डने व्याजासह पैसे दिले तर तेही संस्थांना परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या ‘ई लॉबी’ भूमिपूजन, मोबाईल व्हॅन, यूपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम या सुविधांचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. मायक्रो एटीएमचे वाटप करण्यात आले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, बँकेचा नफा वाढला की त्यावर आयकर वाढत आहे. त्यात शेतकऱ्यांना काही तरी मदत करा, अशी सूचना आमदार पी. एन. पाटील यांची होती. त्यामुळे तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या ५ फेब्रुवारीच्या वार्षिक सभेत त्यास मान्यता घेऊन एप्रिल २०२१ पासून त्याची अंमलबजावणी करणार आहे.

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, राज्य बँकेच्या अगोदर कोल्हापूर जिल्हा बँकेने अद्ययावत सुविधा ग्राहकांना दिली. नवीन तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांनी आत्मसात करून शेतकऱ्यांना समजावून सांगावे. सर्वच विकास संस्थांना मायक्रो एटीएम द्यावे. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी स्वागत केले. आयटी विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संचालक भैया माने यांनी आभार मानले. यावेळी आमदार राजेश पाटील, निवेदिता माने, के. पी. पाटील, अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, विलास गाताडे, असिफ फरास, आर. के. पोवार, अर्चना पाटील, उदयानी साळुंखे उपस्थित होते.

नाबार्डचा बँकेला हात

नाबार्डने यापूर्वी एक मोबाईल व्हॅन बँकेला दिली आहे, आता तीन व्हॅन दिल्या. जिथे बँकेच्या शाखा नाहीत, त्याठिकाणी बँकिंगसाठी ३०० मायक्रो एटीएम दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी नाबार्डची कृतज्ञता व्यक्त केली.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘केडीसीसी’ सर्वात पुढे

डिजिटल प्लॅटफॉर्मवर केडीसीसी बँक सर्वात पुढे असल्याचे ‘नाबार्ड’चे नंदू नाईक सांगितले. तर सहा वर्षे मेहनत घेतल्याने बँक सक्षम झाली. यापुढेही नेटाने काम करा आणि ‘केडीसीसी’ला देशातील नंबर वनची बँक करा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

घरच्याने तपासणी केली तर भांडणे होतात

तीन-चार महिन्यांत मुंबईत बदली होणार असली तरी माझे लक्ष केडीसीसीवर राहील, असे ‘नाबार्ड’चे नंदू नाईक यांनी सांगितले. यावर बँकेची तपासणी तेवढी करून जावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तपासणी नको, घरच्या माणसाने तपासणी केली तर भांडणे होतात, असा चिमटा नाईक यांनी काढला.