शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

जिल्हा बँकेच्या जाचक अटींचा शेतक-यांना फटकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

चंदगड : जिल्हा बँकेच्या जाचक अटींचा फटका सर्वसामान्य शेतकºयांचा बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून जिल्हा बँकेच्या ...

चंदगड : जिल्हा बँकेच्या जाचक अटींचा फटका सर्वसामान्य शेतकºयांचा बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून जिल्हा बँकेच्या नादाला लागण्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेचा आधार घेण्याचा प्रयत्न त्याने चालविल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

शेतक-यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बँकेची निर्मिती झाली. शेतकरी व बँक यांच्यातील दुवा म्हणून गावोगावी सोसायट्या स्थापन करण्यात आल्या.

सुरुवातीला या माध्यमातून शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध होते आणि याचा उपयोग करून शेतकरी आपल्या अडीअडचणींवर मात करत होता. मात्र, अलिकडील काळात सरकारच्या धोरणामुळे जिल्हा बँकेने कर्जाचे निकष बदलले आहेत. याचा नाहक त्रास शेतक-यांना होत आहे.

पीक कर्ज ६ टक्के व्याजदराने मिळत होते. मात्र, बँकेने आता खावटी कर्जाचे घोडे दामटून शेतक-यांना मेटाकुटीला आणले आहे. तसेच त्याचा व्याजदरही १५ टक्के इतका जास्त असल्याने ते कर्ज घ्यायचे की राष्ट्रीय बँकेचा पर्याय स्वीकारावा या द्विधा मन:स्थितीत शेतकरी गुरफटला आहे.

प्रतिक्रिया

सोसायटीचे कर्ज फेडण्यासाठी उसनवारी पैसे घेतले आहेत. पण सोसायटीकडून पूर्वी इतकीही रक्कम मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे आमचे तर कायच झाले नाही उलट घेतलेली उसनवारी फेडण्यासाठी अनेकांकडे हात पसरावे लागत आहेत.

- तानाजी बा. पाटील, प्रगतशील शेतकरी, तुर्केवाडी

चौकट :

जिल्हा बँकेने कर्जाचे निकष बदलले आहेत.

शेतक-यांना ते पटवून देताना सचिवांसह संचालकांची दमछाक होत आहे. अनेकवेळा वादाच्या प्रसंगाना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकतर खावटी कर्जाचा व्याजदर कमी करावा अन्यथा बदलेल्या निकषांमध्ये पुन्हा बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तानाजी प. कागणकर, उपाध्यक्ष, तावरेवाडी सोसायटी.

चौकट :

खावटी कर्ज म्हणजे काय?

ऊसपीक कर्ज मर्यादा संपल्यानंतर कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी हे उपलब्ध केले जाते. बँकेपूर्वी ५० टक्के शेतकºयांना कर्ज देत होते. पण आता त्यामध्ये खावटी व आकस्मिक असे दोन प्रकार करून ३० खावटी व ते खर्च केल्यानंतरच कौटुंबीक खर्चासाठी २० टक्के मंजूर केले जात आहे.