शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिल्हा बॅँकेची गाडी रुळावर

By admin | Updated: July 9, 2014 01:03 IST

आर्थिक अडचणीतून बाहेर : लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग; ठेवी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) अडचणीतून बाहेर पडली आहे. नाबार्ड नियुक्त सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखापरीक्षणात बँकेला ‘अ’ वर्ग मिळाला असून, नागरी बँकांसह सहकारी संस्थांच्या ठेवी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला. बँकेला तब्बल नऊ वर्षांनी ‘अ’ वर्ग मिळाला आहे. बँकेवर नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रशासक आले. आतापर्यंत बँकेचे तीन प्रशासक झाले. धनंजय डोईफोडे, उत्तम इंदलकर व सध्याचे प्रतापसिंह चव्हाण या तिघांनीही आपल्या पद्धतीने बँक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वसुलीबरोबर ठेवी वाढविण्याकडे प्रशासकांनी लक्ष केंद्रित केले होते, पण बँकेच्या एन.पी.ए.मुळे बँक सेक्शन ११(१) मधून बाहेर येणे कठीण होते. रिझर्व्ह बँकेने भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) सुधारण्याची मार्च २०१२ ची डेडलाईन दिली होती. प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी अत्यंत कुशलतेने एन.पी.ए. खाली आणत ‘सीआरएआर’प्लस केला. मार्च २०१२ ला +१.३५ टक्के ‘सीआरएआर’ करत ठेवीमधील अपरक्षण (इरोजन) ‘०’ टक्क्यांवर आणून बँकेला ११(१) मधून बाहेर काढली, पण बँकेचा परवाना कायम ठेवण्यासाठी ‘सीआरएआर’ ४ टक्क्यांपेक्षा अधिक करणे गरजेचे होते. यासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षात त्यांनी विशेष प्रयत्न केले. बँकेचा एन.पी.ए. ५.४० टक्के करून परवाना शाबूत राखला. २०१३-१४ या आर्थिक वर्षात बॅँकेला ‘अ’ वर्ग मिळाल्याने बँकेसमोरील मोठ्या अडचणी दूर झाल्या. ‘नाबार्ड’च्या निकषांनुसार बँकांना १०० गुणांपैकी किमान ७५ गुण पडले तरच ‘अ’ वर्ग दिला जातो. (प्रतिनिधी)