शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

महापालिका निवडणूक लांबल्याने इच्छुकात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग निश्चिती, आरक्षण, मतदार याद्या ही महानगरपालिका निवडणुकीतील महत्त्वाची कामे त्रूरु करण्याच्या सूचना प्राप्त ...

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग निश्चिती, आरक्षण, मतदार याद्या ही महानगरपालिका निवडणुकीतील महत्त्वाची कामे त्रूरु करण्याच्या सूचना प्राप्त होताच राजकीय पक्षांबरोबरच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच राज्य सरकारने राज्यातील पाच महापालिकांवरील प्रशासकांना मुदतवाढ दिल्याने सर्वच पातळीवर नाराजी पसरली आहे.

राज्य सरकारने मागच्या आठवड्यात पाच महानगरपालिकेवरील प्रशासकांना दि. ३० एप्रिलपासून पुढे मुदतवाढ दिली आणि ती अमर्याद कालावधीसाठी आहे. प्रशासकांना मुदत वाढ देण्यात आल्याने या निवडणुका एप्रिल किंबा मे महिन्यात होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग डिसेंबर महिन्यात एकदम कमी झाला. त्यामुळे कोल्हापूर, नवी मुंबई. कल्याण डोंबिवली, वसई, विरार व औरंगाबाद अशा पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासनाने सुरू केली. कोल्हापुरात प्रभाग निश्चित झाले. आरक्षणेही टाकण्यात आली. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम आखून देण्यात आला. दि. १६ फेब्रुवारीपासून या कामाला सुरवात झाली. परंतु राज्य निवडणूक आयोगानेच राज्यात कोराेनाचा संसर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याचे राज्य सरकारला कळविले. दि. २८ डिसेंबरला राज्य सरकारने तसा निर्णय घेऊन प्रशासकांना मुदतवाढ दिली.

दरम्यानच्या काळात निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होणार या अपेक्षेने कोल्हापुरातील सर्वच राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. प्रभागनिहाय उमेदवारांचा शोध, सर्वेक्षण सुरू झाले. उमेदवारांनीही घरोघरी जाऊन आपली प्रचारपत्रके वाटण्यास सुरुवात केली. काही माजी नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांचे मोठ्या दणक्यात उद्घाटने केली. डिजिटल फलक लावून अनेकांनी आपली उमेदवारी जाहीर केली. मंडळाचे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण या सगळ्या तयारीवर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाणी फिरले आहे. निवडणूक लांबली तसे सर्वच उमेदवार अडचणीत आले आहेत. आता आणखी काही दिवस खर्च वाढणार याची जाणीव त्यांना झाली आहे.

-सत्ताधाऱ्यांना ही तर संधी -

राज्यात सत्तेत तसेच महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांनी निवडणूक पुढे गेली ही संधी मानून विकासकामांना गती दिली आहे. राज्य सरकारकडून आणलेल्या निधीतून ही कामे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या काही महिन्यात काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी ३६ कोटींचा निधी आणून त्याची कामे सुरू केली. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनीही पंधरा कोटींचा निधी चार चार पाच प्रभागात दिला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील १५ कोटींचा निधी आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. साधारणपणे वीस प्रभागात तो वाटला जाणार आहे.