शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांविरुद्ध अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:42 IST

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची सुमारे २५0 एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गुरुवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ...

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची सुमारे २५0 एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गुरुवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.शहरात सध्या अनेक समस्या असून, त्या सोडविण्याची गरज आहे. याकडे लक्ष न देता बेकायदेशीर प्रवृत्तींना पाठबळ देऊन महानगरपालिकेचा अवमान करायचा असेल तर या शहराला असलेला महापालिकेचा दर्जा रद्द करून ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, अशी उपहासात्मक मागणीही राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी पत्रकाद्वारे केली आहे.पालकमंत्री पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यावर या पत्रकात सडकून टीका करण्यात आली आहे. पालकमंत्री व महाडिक यांना याच आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांबाबत इंटरेस्ट का? काही मूठभर लोकांसाठी कायदा मोडण्याचे धारिष्ट्य का दाखविले जात आहे? तेच लोक केवळ मतदार आहेत आणि बाकीचे कोणी मतदार नाहीत का? असे प्रश्न विचारण्यात आलेआहेत.ट्रक टर्मिनल, कचरा डेपो, ना विकास क्षेत्र या कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागा काही व्यापारी मंडळींनी पैशाच्या तसेच राजकीय वरदहस्ताच्या जोरावर खरेदी केल्या आहेत. जागा खरेदी करताना मूळ मालकांचीही फसवणूक केली आहे. अशा प्रवृत्तींना कायदेशीररीत्या पायबंद घालण्याची गरज आहे. मात्र पालकमंत्री त्यांना अभय देत आहेत. सरकारचा पारदर्शी कारभार यालाच म्हणायचा का? शाश्वत विकास, पार्टी विथ डिफरन्सच्या गप्पा मारणाºया भाजप सरकारने या कामामध्ये आपली नैतिकता तपासावी व ढवळाढवळ थांबवावी, असे पत्रकात म्हटले आहे.राज्य सरकार जर महानगरपालिकेचा कारभार मुंबईत बसून चालविणार असेल तर मग महानगरपालिका कशाला सुरू ठेवता? कर्मचाºयांचे पगार देण्यापुरतीच महापालिका आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना मूठभर लोकांसाठी चुकीचे निर्णय घेऊन शहराच्या विकासाचे चाक चिखलात रुतवू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पत्रकावर उपमहापौर सुनील पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, अनिल कदम, विनायक फालके, सुनील देसाई, जहिदा मुजावर यांच्या सह्या आहेत.व्यापक लढायाप्रकरणी जर येत्या आठ दिवसांत महानगरपालिकेकडून रीतसर कारवाई झाली नाही तर या अनधिकृत बांधकाम हटावसाठी कृती समितीमार्फत शहराच्यावतीने व्यापक लढा उभारण्यात येईल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.