शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालकमंत्र्यांविरुद्ध अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:42 IST

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची सुमारे २५0 एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गुरुवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ...

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची सुमारे २५0 एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गुरुवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.शहरात सध्या अनेक समस्या असून, त्या सोडविण्याची गरज आहे. याकडे लक्ष न देता बेकायदेशीर प्रवृत्तींना पाठबळ देऊन महानगरपालिकेचा अवमान करायचा असेल तर या शहराला असलेला महापालिकेचा दर्जा रद्द करून ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, अशी उपहासात्मक मागणीही राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी पत्रकाद्वारे केली आहे.पालकमंत्री पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यावर या पत्रकात सडकून टीका करण्यात आली आहे. पालकमंत्री व महाडिक यांना याच आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांबाबत इंटरेस्ट का? काही मूठभर लोकांसाठी कायदा मोडण्याचे धारिष्ट्य का दाखविले जात आहे? तेच लोक केवळ मतदार आहेत आणि बाकीचे कोणी मतदार नाहीत का? असे प्रश्न विचारण्यात आलेआहेत.ट्रक टर्मिनल, कचरा डेपो, ना विकास क्षेत्र या कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागा काही व्यापारी मंडळींनी पैशाच्या तसेच राजकीय वरदहस्ताच्या जोरावर खरेदी केल्या आहेत. जागा खरेदी करताना मूळ मालकांचीही फसवणूक केली आहे. अशा प्रवृत्तींना कायदेशीररीत्या पायबंद घालण्याची गरज आहे. मात्र पालकमंत्री त्यांना अभय देत आहेत. सरकारचा पारदर्शी कारभार यालाच म्हणायचा का? शाश्वत विकास, पार्टी विथ डिफरन्सच्या गप्पा मारणाºया भाजप सरकारने या कामामध्ये आपली नैतिकता तपासावी व ढवळाढवळ थांबवावी, असे पत्रकात म्हटले आहे.राज्य सरकार जर महानगरपालिकेचा कारभार मुंबईत बसून चालविणार असेल तर मग महानगरपालिका कशाला सुरू ठेवता? कर्मचाºयांचे पगार देण्यापुरतीच महापालिका आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना मूठभर लोकांसाठी चुकीचे निर्णय घेऊन शहराच्या विकासाचे चाक चिखलात रुतवू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पत्रकावर उपमहापौर सुनील पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, अनिल कदम, विनायक फालके, सुनील देसाई, जहिदा मुजावर यांच्या सह्या आहेत.व्यापक लढायाप्रकरणी जर येत्या आठ दिवसांत महानगरपालिकेकडून रीतसर कारवाई झाली नाही तर या अनधिकृत बांधकाम हटावसाठी कृती समितीमार्फत शहराच्यावतीने व्यापक लढा उभारण्यात येईल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.