शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांविरुद्ध अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:42 IST

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची सुमारे २५0 एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गुरुवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ...

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची सुमारे २५0 एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या जागेतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गुरुवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.शहरात सध्या अनेक समस्या असून, त्या सोडविण्याची गरज आहे. याकडे लक्ष न देता बेकायदेशीर प्रवृत्तींना पाठबळ देऊन महानगरपालिकेचा अवमान करायचा असेल तर या शहराला असलेला महापालिकेचा दर्जा रद्द करून ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, अशी उपहासात्मक मागणीही राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी पत्रकाद्वारे केली आहे.पालकमंत्री पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यावर या पत्रकात सडकून टीका करण्यात आली आहे. पालकमंत्री व महाडिक यांना याच आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांबाबत इंटरेस्ट का? काही मूठभर लोकांसाठी कायदा मोडण्याचे धारिष्ट्य का दाखविले जात आहे? तेच लोक केवळ मतदार आहेत आणि बाकीचे कोणी मतदार नाहीत का? असे प्रश्न विचारण्यात आलेआहेत.ट्रक टर्मिनल, कचरा डेपो, ना विकास क्षेत्र या कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागा काही व्यापारी मंडळींनी पैशाच्या तसेच राजकीय वरदहस्ताच्या जोरावर खरेदी केल्या आहेत. जागा खरेदी करताना मूळ मालकांचीही फसवणूक केली आहे. अशा प्रवृत्तींना कायदेशीररीत्या पायबंद घालण्याची गरज आहे. मात्र पालकमंत्री त्यांना अभय देत आहेत. सरकारचा पारदर्शी कारभार यालाच म्हणायचा का? शाश्वत विकास, पार्टी विथ डिफरन्सच्या गप्पा मारणाºया भाजप सरकारने या कामामध्ये आपली नैतिकता तपासावी व ढवळाढवळ थांबवावी, असे पत्रकात म्हटले आहे.राज्य सरकार जर महानगरपालिकेचा कारभार मुंबईत बसून चालविणार असेल तर मग महानगरपालिका कशाला सुरू ठेवता? कर्मचाºयांचे पगार देण्यापुरतीच महापालिका आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना मूठभर लोकांसाठी चुकीचे निर्णय घेऊन शहराच्या विकासाचे चाक चिखलात रुतवू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पत्रकावर उपमहापौर सुनील पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, अनिल कदम, विनायक फालके, सुनील देसाई, जहिदा मुजावर यांच्या सह्या आहेत.व्यापक लढायाप्रकरणी जर येत्या आठ दिवसांत महानगरपालिकेकडून रीतसर कारवाई झाली नाही तर या अनधिकृत बांधकाम हटावसाठी कृती समितीमार्फत शहराच्यावतीने व्यापक लढा उभारण्यात येईल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.