शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

वस्त्रोद्योगात अस्वस्थता

By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST

अर्थसंकल्पात तरतूदच नाही : देशात दोन नंबरचा उद्योग असूनही दुर्लक्ष

इचलकरंजी : देशातील बहुतांश राज्यांमध्ये असणाऱ्या वस्त्रोद्योगासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा कर व अनुदान प्रणालीमध्ये बदल असल्याचा उल्लेख नसल्याने येथील वस्त्रोद्योग व्यवसायात अस्वस्थता पसरली आहे. शेतीनंतर रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाच्या पदरात निराशाच पडली आहे.वस्त्रोद्योगाची व्याप्ती महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, आदी राज्यांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, वापी अशी मोठी वस्त्रोद्योगाची केंद्रे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाची खास दखल घेतली जाण्याची अपेक्षा होती. वस्त्रोद्योगातील सर्वच घटक उद्योजकांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष होते.वस्त्रोद्योगात आधुनिक तंत्रज्ञान आणणाऱ्या टेक्निकल अप ग्रेडेशन फंड (टफ्स) ही योजना सरकारने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ राबविली. त्यामुळे हजारो कोटी रुपये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या आयातीमध्ये गुंतवले गेले. त्याचा परिणाम म्हणून कपडा व तयार कपडे निर्यात होऊन आपल्या देशाला परकीय चलन मिळाले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या योजनेंतर्गत नवीन उद्योजकांनी केलेल्या प्रस्तावांना अनुदान मिळेनासे झाले आहे. योजनेतील ३० टक्के अनुदानाची रक्कम न मिळाल्याने अनेक उद्योजकांची बॅँकांच्या कर्जाची खाती थकबाकीत गेली आहेत. त्यांच्यावर जप्तीची टांगती तलवार आहे, अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात खासदार राजू शेट्टी व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील आॅटोलूम ओनर्स असोसिएशनचे एक शिष्टमंडळ केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त किरण सोनिगुप्ता यांना भेटले होते. त्यांनी टफ्सअंतर्गत करण्यात आलेल्या प्रस्तावांचा जानेवारीअखेर निपटारा केला जाईल व अनुदान संबंधितांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती; पण फेब्रुवारी महिना संपला तरीसुद्धा आणि केंद्रीय अर्थसंकल्पात त्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने आता टफ्सअंतर्गत प्रस्ताव करणारे उद्योजकसुद्धा धास्तावले आहेत.अशा पार्श्वभूमीवर आता अन्य राज्यांपेक्षा महाग असलेली वीज एप्रिल महिन्यापासून आणखीन महाग होणार असल्याने महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगात आणखीन एक संकट नव्याने उभे राहिले आहे. याचा परिणाम म्हणून वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)भविष्य अंधकारमयवस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार भरीव तरतूद करेल, अशी अपेक्षा असताना अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाचा साधा उल्लेखही नसल्याने उद्योजक नाराज झाले आहेत, अशी प्रतिक्रिया यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली. फक्त बड्या उद्योजकांवरच सरकारची मेहरनजर असल्याचे या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाचे भविष्य अंधकारमय झाल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.