शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

‘ग्राहक’ कायद्याच्या प्रसाराबाबत अनास्था

By admin | Updated: December 23, 2014 23:41 IST

ग्राहक दिन विशेष

प्रवीण देसाई- कोल्हापूर --ग्राहक हा राजा आहे...तो कुठे नाडला जाऊ नये. त्याच्यावर अन्याय झाल्यावर त्याला तातडीने न्याय मिळावा. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आहे. परंतु त्या कायद्याची माहिती कितीजणांना आहे. हा एक प्रश्नच आहे. याच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी शासनाची आहे. परंतु केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन पातळीवर अनास्था दिसत आहे. ग्राहकराजापर्यंतच हा कायदा पोहोचण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.ग्राहकांंना लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने खास ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. २४ डिसेंबर १९८६ ला तो अस्तित्वात आला. त्यामुळे हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या कायद्याबाबत अद्याप नीट माहितीही नसल्याचे चित्र आहे. या कायद्यापासून सर्वचजण अनभिज्ञ आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु त्यांचे प्रमाण फार कमी आहे. कमी वेळेत, कमी खर्चात व मानसिक त्रास न होता ग्राहक न्यायालयाकडून न्याय मिळू शकतो. हा उद्देश ग्राहक तक्रार निवारण मंच (ग्राहक न्यायालय) ची निर्मिती करण्यामागील आहे. याला न्यायालयाऐवजी तक्रार निवारण मंच असे संबोधण्यात आले. न्यायदान करणाऱ्या व्यक्तीला न्यायाधीशाऐवजी या मंचचा अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. उद्देश एकच की सर्वसामान्यांना कुठलीही भीती वाटू नये.इतक्या चांगल्या पद्धतीने रचना करून न्याय देण्याची यंत्रणा उभी राहिली असताना याकडे तक्रार दाखल करण्याचे प्रमाण त्या तुलनेत कमीच म्हणावे लागेल. कारणांचा विचार केल्यास कायद्याच्या योग्य माहितीचा अभाव हेच दिसते. आपण एखाद्या वस्तूची खरेदी केल्यावर जर आपली फसवणूक झाली, तर आपण न्याय कुठे मागायचा? त्याची पध्दत कोणती याबाबत त्याला शोधाशोध करायची वेळ येते. हा कायदा फक्त ग्राहकांसाठी लढणाऱ्या संघटनांपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने कायद्याच्या प्रबोधनासाठी कोणताच कार्यक्रम हाती घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच अनेक प्रश्न जसेच्या तसेच राहतात. त्यामुळे प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला पाहिजे.कायद्याचे फायदेकायदा माहीत झाल्यास ग्राहकाला अल्प मोबदल्यात वकील न देता आपली बाजू न्यायमंचासमोर मांडता येते.९० दिवसांत ग्राहकाला न्याय मिळू शकतो.अपिलासाठी राज्य व राष्ट्रीय आयोगाकडे अपील करता येते.तेथेही समाधानकारक निर्णय झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेता येते.कायदा माहीत नसल्याचे तोटेकायद्याची माहिती नसल्याने ग्राहकांना फसवणुकीला सामोरे जावे लागते.बिलाची मागणी करत नसल्याने ग्राहकमंचाकडे दाद मागता येत नाही.दाद मागण्यासाठी नेमके कुठे गेले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन नसल्याने ग्राहक अजूनही दिशाहिन आहे.कायद्याची माहिती नसल्याने व्यापारी, विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्थांकडून ग्राहकाला अज्ञानी समजून फसवणूक होऊ शकते.काय केले पाहिजेजिल्हा प्रशासनाने शाळा ते महाविद्यालयीन स्तरावर व्याख्याने, शिबिरे आयोजित करून कायद्याची माहिती दिली पाहिजे.यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य अग्रभागी राहिले पाहिजेत.प्रसारमाध्यमांनीही सामाजिक बांधीलकी म्हणून प्रबोधन, प्रसारामध्ये हातभार लावला पाहिजे.