शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

आजऱ्यात भातावर करपा रोगाचे थैमान

By admin | Updated: October 23, 2014 22:50 IST

शेतकऱ्यांमध्ये भीती : घनसाळसह पिके अडचणीत

शेतकऱ्यांमध्ये भीती : घनसाळसह पिके अडचणीतआजरा : गेले पंधरा दिवस सुरू असलेला हवामानातील बदलामुळे आजरा तालुक्यातील घनसाळसह, संकरित भात पिकांवर मानेवरील करपा (मानमोड्या) रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असल्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गाकडून या नुकसानीचे शास्त्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे.सध्या तालुक्यातील बहुतांश भागातील भात पिके पोसावली आहेत. मात्र, अशा पोसावलेल्या भात पिकांच्या लोंबावर मानेवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. आजरा, देवर्डे, पोळगाव, श्रृंगारवाडी, चाफवडे, गवसे भागात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या प्रयत्नातून घनसाळ भातक्षेत्र वाढीच्या उद्देशाने चालू साली १५० एकर क्षेत्रांवर घनसाळ लागवडीचा पथदर्शी प्रयोग राबविला आहे. यातील बहुतांश भात पीक या रोगामुळे अडचणीत आले आहे. जादा दिवसांचा कालावधी घेणाऱ्या भाताच्या संकरित जातीही या रोगाला बळी पडत आहेत.केवळ चारच दिवसांत उभे असणारे पीक वाया जात आहे. यामुळे वर्षभराकरिता लागणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या धान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिके पोसावली असतानाच रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने औषध फवारणीचा कालावधीही निघून गेला आहे. जिथे भात पिके अद्याप पोसावलेली नाहीत, तेथे काही अंशी प्रतिबंधात्मक उपाय शक्य आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न पुढे येत आहे. (प्रतिनिधी)शास्त्रज्ञांमार्फत पाहणी व्हावीसध्या भात उत्पादक शेतकरी मानेवरील करपा रोगामुळे अडचणीत आला असून, कृषिक्षेत्रातील शास्त्रज्ञांमार्फत पिकांची पाहणी होऊन नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली.