शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

चर्चेतील मुलाखत: कोल्हापुरात जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचे संशोधन मौलिक ठरणार आहे. सहा वर्षांचा अभ्यास आणि तीन वर्षांचा प्रत्यक्ष ...

शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचे संशोधन मौलिक ठरणार आहे. सहा वर्षांचा अभ्यास आणि तीन वर्षांचा प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव यामुळे मी संशोधित केलेले जैविक खत चांगले परिणाम दाखवत आहे.

- सुप्रिया कुसाळे, कोल्हापूर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: वळीवडे (ता. करवीर) येथील सुप्रिया कुसाळे या राजाराम महाविद्यालयातील विद्यार्थिनीने जैविक खतावर केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ऑफ न्यू दिल्लीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत या संशोधनाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पिकांचे उत्पादन, वाढ आणि जमिनीची गुणवत्ता सुधारणाऱ्या जीवाणूच्या संशोधनानिमित्त तिच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न: राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेलेले हे नेमके संशोधन काय आहे?

उत्तर : मी राजाराम महाविद्यालयात २०१४ पासून इको फ्रेंडली ॲन्ड काॅस्ट इफेक्टीव्ह प्रॉडक्शन ऑफ फायटेज प्रोड्युसिंग बायोईनॉक्लन्ट ॲन्ड इफिशिअन्ही इन फिल्ड या विषयावर पीएच.डी. करत आहे. हे करताना संशोधनाअंती जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश घेऊन त्याचे रुपांतर पिकांच्या वाढीसाठी करण्यात एक जीवाणू महत्त्वाचा असल्याचे आढळले. प्रयोगशाळेत त्याची कृत्रिमपणे वाढ करुन ती प्रत्यक्षात जमिनीत सोडली. त्याचे परिणाम चांगले आल्याने संशोधनाचा व्याप अधिक वाढवला. सध्या बाजारात सेंद्रिय आणि असेंद्रिय खते उपलब्ध आहेत. खासकरुन सेंद्रिय खतांना मागणी वाढली आहे. पण सध्या बाजारात उपलब्ध असलेली बायो फर्टिलायझर्स ही असेंद्रियसाठी उपयुक्त ठरत नाहीत, असे आढळल्याने दोन्हींना एकाच धाग्यात गुंफणारे संशोधन पुढे आणण्यावर भर दिला. यातून जीवाणूचा शोध लावला.

प्रश्न: जीवाणूचे संवर्धन व वापर कसा होतो?

उत्तर : हे जीवाणू द्रव स्वरुपात तयार केले आहे. जमिनीत पुरेशी ओल असताना त्याची आळवणी केल्याने पिकांवर त्याचा चांगला परिणाम दिसला आहे. खासकरुन ऊस, मका, ज्वारी, मिरची, आले, हळद, भात या पिकांच्या उत्पादनामध्ये दहा टक्केपर्यंत वाढ झाल्याचे दिसले आहे. फुलझाडांमध्ये भरपूर फुटवे व फुले येण्यासाठीही हे जीवाणू उपयोगी ठरत आहेत.

प्रश्न : हे जीवाणू नेमके काम कसे करतात?

उत्तर: जमिनीत खते टाकली जातात, पण ती सर्व पिकांना लागू होतातच असे नाही. मृत स्वरुपात असणारे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस, झिंक यांना परत सक्रिय करुन त्यांचा उपयोग पिकांच्या उत्पादन वाढीसाठी करण्याचे काम हे जीवाणू करतात. ताग, धैंच्या यासारखी हिरवळीची खते व गांडूळ, शेणखताच्या वापरामुळे मुळातच हे जीवाणू जमिनीत तयार होतात. पण अलीकडे ही पारंपरिक खते कमी वापरली जात असल्याने या जीवाणूंचे प्रमाण घटले असून जमिनीची सुपीकताही खालावत चालली आहे. आता नव्याने संशोधन करत हे जीवाणू द्रवस्वरुपात पुन्हा जमिनीत सोडून जमीन पुन्हा एकदा सुपीक बनवता येते.

चौकट ०१

सुप्रिया प्रकाश कुसाळे या शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील शेती करतात. भाऊ एमबीए झाला आहे. आई गृहिणी आहे. घरच्या शेतीच्या अनुभवासह मुलगी नवे संशोधन करत आहे म्हटल्यावर वडील कुसाळे यांनीही ठामपणे पाठीशी उभे राहत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संशोधन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट ०२

कुसाळे हिने केलेले हे संशोधन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याने आणि पिकांमध्ये त्याची उपयुक्तताही आढळून आल्याने भविष्यात व्यापारी तत्त्वावर त्याचे उत्पादन करण्याचा त्यांचा विचार आहे. शिवाय त्यांनी गेल्यावर्षी याचे पेटंटही मिळवले आहे.

फोटो: २४१२२०२०-कोल-सुप्रीया कुसाळे