शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तलाव फुटला तो दगड खराब असल्यामुळे नव्हे, तर टक्केवारीमुळे तालुक्यातील जनतेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

शिवाजी सावंत /गारगोटी भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प फुटला आणि प्रशासन जबाबदार म्हणत राजकीय पक्षांनी आक्रोश मोर्चा काढला; ...

शिवाजी सावंत /गारगोटी

भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प फुटला आणि प्रशासन जबाबदार म्हणत राजकीय पक्षांनी आक्रोश मोर्चा काढला; पण ‘सब गोलमाल है !’, ‘ये पब्लिक जाणती हैं !’ तलाव फुटल्यावर आमदार, खासदार, पालकमंत्री वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिल्यावर प्रशासन तेथील दगड हा क्वार्टझाइट असल्याचा निर्वाळा देत आहेत. जर हा दगड सच्छिद्र आणि खराब होता, तर तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही जागा का नाकारली नाही? तलाव फुटताना दगड निखळून गेले असते. मुळात आउटलेटला असलेल्या गळतीमुळे तलाव फुटला. बांध तुटून गेल्यावर आउटलेटचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने प्रचंड प्रमाणात गळती लागल्याचे स्पष्ट दिसत असताना आता धरणाचा खडक चांगला नसल्याचा दावा करून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न पाटबंधारे विभागाचे अधिकारी करीत आहेत. बांधाचे काम करताना त्याच्यावर दाब देऊन माती बसवलेली नाही, काळ्या मातीचा थर दिलेला नाही. हे आता स्पष्ट दिसते. यावरून तलाव हा निकृष्ट दर्जाचे काम केल्याने फुटला असल्याचे स्पष्ट होते. ठेकेदार काम करीत असताना हे अधिकारी, लोकप्रतिनिधी काय करीत होते? पदवीधारक असलेले अधिकारी एवढे निर्बुद्ध होते का ? त्यांना काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे, हे समजत नव्हते का ? मग ते का गप्प बसले? अशी अनुत्तरित प्रश्नांची मालिका तयार होते.

या प्रश्नांची उकल शोधल्यास विकास काम मंजूर झाल्यापासून टक्का सुरू होतो, तो कोठे येऊन थांबतो ? हे सर्वांना माहीत आहे. अगदी १५ टक्क्यांपासून सुरू झालेली साखळी २७ टक्क्यांपर्यंत येऊन थांबते. ठेकेदार हा व्यावसायिक असल्यामुळे तो खिशातील पैसे घालून काम करणार नाही, हे उघड सत्य आहे. मग तो काम करताना नफा - तोट्याचा विचार करून काम करतो. अधिकारी याला पाठीशी घालतात. शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी या अधिकाऱ्यांना, ठेकेदाराला काहीही वाटत नाही का? लोकांच्या जीवन-मरणाशी संबंध असलेली कामे तरी चांगल्या पद्धतीने व्हावीत, अशी जनभावना आहे.

तलाव फुटला तरी तो दगड खराब असल्याने नव्हे तर दगडाच्या काळजाच्या टक्केवारी खाणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामुळे फुटला आहे. लोक आता इतकेही अज्ञानी नाहीत की, त्यांना हा गोलमाल समजत नाही. लोक खूप हुशार आहेत त्यामुळे ‘ये पब्लिक है सब जाणती है’ की सगळा मामलाचा गोलमाल आहे.

या भागातील लोकांचे दैव बलवत्तर म्हणून हा तलाव रात्री फुटला. परिणामी जीवितहानी कमी प्रमाणात झाली. दिवसा फुटला असता तर मृतदेह कर्नाटकात शोधावे लागले असते, तेही शेकड्यांनी !

अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

या तलावाची तपासणी निष्पक्षपातीपणे होणे गरजेचे आहे. दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याची लोकमागणी जोर धरत आहे.