शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

तलाव फुटला तो दगड खराब असल्यामुळे नव्हे, तर टक्केवारीमुळे तालुक्यातील जनतेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

शिवाजी सावंत /गारगोटी भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प फुटला आणि प्रशासन जबाबदार म्हणत राजकीय पक्षांनी आक्रोश मोर्चा काढला; ...

शिवाजी सावंत /गारगोटी

भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प फुटला आणि प्रशासन जबाबदार म्हणत राजकीय पक्षांनी आक्रोश मोर्चा काढला; पण ‘सब गोलमाल है !’, ‘ये पब्लिक जाणती हैं !’ तलाव फुटल्यावर आमदार, खासदार, पालकमंत्री वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिल्यावर प्रशासन तेथील दगड हा क्वार्टझाइट असल्याचा निर्वाळा देत आहेत. जर हा दगड सच्छिद्र आणि खराब होता, तर तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही जागा का नाकारली नाही? तलाव फुटताना दगड निखळून गेले असते. मुळात आउटलेटला असलेल्या गळतीमुळे तलाव फुटला. बांध तुटून गेल्यावर आउटलेटचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने प्रचंड प्रमाणात गळती लागल्याचे स्पष्ट दिसत असताना आता धरणाचा खडक चांगला नसल्याचा दावा करून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न पाटबंधारे विभागाचे अधिकारी करीत आहेत. बांधाचे काम करताना त्याच्यावर दाब देऊन माती बसवलेली नाही, काळ्या मातीचा थर दिलेला नाही. हे आता स्पष्ट दिसते. यावरून तलाव हा निकृष्ट दर्जाचे काम केल्याने फुटला असल्याचे स्पष्ट होते. ठेकेदार काम करीत असताना हे अधिकारी, लोकप्रतिनिधी काय करीत होते? पदवीधारक असलेले अधिकारी एवढे निर्बुद्ध होते का ? त्यांना काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे, हे समजत नव्हते का ? मग ते का गप्प बसले? अशी अनुत्तरित प्रश्नांची मालिका तयार होते.

या प्रश्नांची उकल शोधल्यास विकास काम मंजूर झाल्यापासून टक्का सुरू होतो, तो कोठे येऊन थांबतो ? हे सर्वांना माहीत आहे. अगदी १५ टक्क्यांपासून सुरू झालेली साखळी २७ टक्क्यांपर्यंत येऊन थांबते. ठेकेदार हा व्यावसायिक असल्यामुळे तो खिशातील पैसे घालून काम करणार नाही, हे उघड सत्य आहे. मग तो काम करताना नफा - तोट्याचा विचार करून काम करतो. अधिकारी याला पाठीशी घालतात. शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी या अधिकाऱ्यांना, ठेकेदाराला काहीही वाटत नाही का? लोकांच्या जीवन-मरणाशी संबंध असलेली कामे तरी चांगल्या पद्धतीने व्हावीत, अशी जनभावना आहे.

तलाव फुटला तरी तो दगड खराब असल्याने नव्हे तर दगडाच्या काळजाच्या टक्केवारी खाणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामुळे फुटला आहे. लोक आता इतकेही अज्ञानी नाहीत की, त्यांना हा गोलमाल समजत नाही. लोक खूप हुशार आहेत त्यामुळे ‘ये पब्लिक है सब जाणती है’ की सगळा मामलाचा गोलमाल आहे.

या भागातील लोकांचे दैव बलवत्तर म्हणून हा तलाव रात्री फुटला. परिणामी जीवितहानी कमी प्रमाणात झाली. दिवसा फुटला असता तर मृतदेह कर्नाटकात शोधावे लागले असते, तेही शेकड्यांनी !

अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

या तलावाची तपासणी निष्पक्षपातीपणे होणे गरजेचे आहे. दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याची लोकमागणी जोर धरत आहे.