शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

टोलबाबत चर्चेस वेळ द्यावा

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘शब्द’ पाळण्याची विनंती

कोल्हापूर : भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे घेतलेल्या सभेत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे, कोल्हापूरकरांची नेमकी मागणी व या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ द्यावा, अशी मागणी आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व निमंत्रक निवास साळोखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे पत्र कृती समितीने एक नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री कार्यालयास पाठविले आहे.पत्रात म्हटले आहे, ‘कोल्हापूरच्या अन्यायी टोल प्रश्नाबाबत आपणास पुरेपूर माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुम्ही कोल्हापूरकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी भाजपला जनतेने मतदान करण्याचे आवाहनही केले होते. याप्रमाणे भाजपला जनतेने निवडून देत, राज्यातील सत्ताही दिली आहे. कोल्हापूरकरांच्या सुदैवाने टोलमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपणाकडेच राज्याची सत्तासूत्रे आली आहेत. त्यामुळे कोल्हापूरला टोलमुक्त करून न्याय द्याल, असा विश्वास आहे.’आघाडी शासनाच्या काळात साडेचार वर्षे कोल्हापूरकरांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. अजूनही या प्रश्नासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनास पूर्णविराम देण्यासाठी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ हाच पर्याय आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिष्टमंडळास भेटीसाठी आपल्या सोयीची वेळ द्यावी, कोल्हापूरकरांचे रास्त मागणे ऐकून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ आॅक्टोबरला पदाची शपथ घेतली. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुपारी मुंबईतील मंत्रालयात हे पत्र पाठविले आहे. पत्र रजिस्टर्ड व मेलही केले आहे. ते सचिवांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री नागपूरहून आल्यानंतर याबाबत उत्तर अपेक्षित आहे. - निवास साळोखे,(निमंत्रक कृती समिती)