शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

टोलबाबत चर्चेस वेळ द्यावा

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘शब्द’ पाळण्याची विनंती

कोल्हापूर : भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे घेतलेल्या सभेत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे, कोल्हापूरकरांची नेमकी मागणी व या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ द्यावा, अशी मागणी आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व निमंत्रक निवास साळोखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे पत्र कृती समितीने एक नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री कार्यालयास पाठविले आहे.पत्रात म्हटले आहे, ‘कोल्हापूरच्या अन्यायी टोल प्रश्नाबाबत आपणास पुरेपूर माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुम्ही कोल्हापूरकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी भाजपला जनतेने मतदान करण्याचे आवाहनही केले होते. याप्रमाणे भाजपला जनतेने निवडून देत, राज्यातील सत्ताही दिली आहे. कोल्हापूरकरांच्या सुदैवाने टोलमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपणाकडेच राज्याची सत्तासूत्रे आली आहेत. त्यामुळे कोल्हापूरला टोलमुक्त करून न्याय द्याल, असा विश्वास आहे.’आघाडी शासनाच्या काळात साडेचार वर्षे कोल्हापूरकरांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. अजूनही या प्रश्नासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनास पूर्णविराम देण्यासाठी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ हाच पर्याय आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिष्टमंडळास भेटीसाठी आपल्या सोयीची वेळ द्यावी, कोल्हापूरकरांचे रास्त मागणे ऐकून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ आॅक्टोबरला पदाची शपथ घेतली. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुपारी मुंबईतील मंत्रालयात हे पत्र पाठविले आहे. पत्र रजिस्टर्ड व मेलही केले आहे. ते सचिवांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री नागपूरहून आल्यानंतर याबाबत उत्तर अपेक्षित आहे. - निवास साळोखे,(निमंत्रक कृती समिती)