शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टोलबाबत चर्चेस वेळ द्यावा

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘शब्द’ पाळण्याची विनंती

कोल्हापूर : भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे घेतलेल्या सभेत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे, कोल्हापूरकरांची नेमकी मागणी व या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ द्यावा, अशी मागणी आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व निमंत्रक निवास साळोखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे पत्र कृती समितीने एक नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री कार्यालयास पाठविले आहे.पत्रात म्हटले आहे, ‘कोल्हापूरच्या अन्यायी टोल प्रश्नाबाबत आपणास पुरेपूर माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुम्ही कोल्हापूरकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी भाजपला जनतेने मतदान करण्याचे आवाहनही केले होते. याप्रमाणे भाजपला जनतेने निवडून देत, राज्यातील सत्ताही दिली आहे. कोल्हापूरकरांच्या सुदैवाने टोलमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपणाकडेच राज्याची सत्तासूत्रे आली आहेत. त्यामुळे कोल्हापूरला टोलमुक्त करून न्याय द्याल, असा विश्वास आहे.’आघाडी शासनाच्या काळात साडेचार वर्षे कोल्हापूरकरांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. अजूनही या प्रश्नासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनास पूर्णविराम देण्यासाठी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ हाच पर्याय आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिष्टमंडळास भेटीसाठी आपल्या सोयीची वेळ द्यावी, कोल्हापूरकरांचे रास्त मागणे ऐकून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ आॅक्टोबरला पदाची शपथ घेतली. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुपारी मुंबईतील मंत्रालयात हे पत्र पाठविले आहे. पत्र रजिस्टर्ड व मेलही केले आहे. ते सचिवांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री नागपूरहून आल्यानंतर याबाबत उत्तर अपेक्षित आहे. - निवास साळोखे,(निमंत्रक कृती समिती)