शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पाचशे वाढ देणाऱ्यांबरोबर चर्चा करा

By admin | Updated: September 7, 2015 00:14 IST

किमान वेतन प्रश्न : ए. बी. पाटील यांचे आवाहन; अन्यथा आंदोलन चालूच राहाणार

इचलकरंजी : जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेल्या ५०० रुपयांपेक्षा जास्त वाढ देण्यास तयार असलेल्या कारखानदारांबरोबर कामगारांनी चर्चा करावी. त्यांच्यात ठरलेला तोडगा कामगार संघटनेला कळवावा आणि कारखानदार, कामगार व संघटना यांच्यात बोलणी झाल्यानंतरच सायझिंग कारखाने चालू करावेत. अन्यत्र मात्र उच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून बेमुदत संप सुरूच राहील, अशी घोषणा सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या मेळाव्यात कामगार नेते ए. बी. पाटील यांनी केली.येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनात काल, शनिवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कामगार संघटनेने थोरात चौकात कामगारांचा रविवारी मेळावा आयोजित केला होता. पाटील म्हणाले, २७ वर्षे जाहीर न झालेले सन २०१३ मधील किमान वेतनाचे ड्राफ्ट नोटिफिकेशन सरकारने दाबून ठेवले होते; पण लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बडगा उगारताच सुधारित किमान वेतन बाहेर आले. सरकारनेच जाहीर केलेल्या किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगारांनी संप केला आहे. सायझिंगधारक आमच्याशी चर्चाच करीत नाहीत. आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार आहोत. कालच्या बैठकीत काही मोजकेच वगळता बाकी सर्व कामगार संघटनेवर दबाव टाकण्यासाठीच आले होते. त्यांच्याकडून संप मागे घ्या आणि गाव चालू करूया, असा वारंवार आग्रह होता, असाही आरोप केला. या मेळाव्यात आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, मनोहर ढवळे, आदींची भाषणे झाली.(प्रतिनिधी)कामगाराचा मालक आणि ‘काडीपेटी’आम्ही कामगारांचे मालक झालोय, असे म्हणणाऱ्या सायझिंग मालकाच्या पुढाऱ्याने लक्षात ठेवावे की, भले कामगाराचा मालक झाला की त्याची नीती बदलते आणि तो मालक पिळवणूक करूनच मोठा होतो, अशी टीका पाटील यांनी केली. तर एक मालक पुढारी तर खिशातून ‘काडीपेटी’ घेऊनच फिरतोय, अशी खिल्ली उडवित तो जाईल तिथे काडी ओढून पेटवित सुटतोय, असे त्यांनी म्हटले.