शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

चिनी वस्तू नाकारा, राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:24 IST

सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

कोल्हापूर : सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

ते म्हणाले, चीनने १९६३ च्या युद्धात व त्यानंतरही भारताचा भूभाग बळकावला आहे. अनेकदा देशात घुसखोरी केली जात आहे. डोकलाम येथे चीनच्या लष्करी हालचालींमुळे भारताच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावरही चीनकडून भारताच्या विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपल्याकडून दैनंदिन जीवनात चिनी वस्तूंच्या केल्या जाणाºया वापरामुळे अप्रत्यक्षपणे चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभारच लावला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा व चीनच्या कारवायांबाबत जागरूक राहावे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

या अंतर्गत समाजातील विविध संस्था, मंडळे, महिला बचत गटांना अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. चीनच्या कारवायांची माहिती देणारी व स्वदेशी वस्तूंबाबतची पत्रके वाटली जाणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाणार आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे; तसेच चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेस जिल्हा कार्यवाह केदार जोशी, संयोजक केशव गावेकर, जिल्हा संयोजक अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.