शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

चिनी वस्तू नाकारा, राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:24 IST

सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

कोल्हापूर : सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

ते म्हणाले, चीनने १९६३ च्या युद्धात व त्यानंतरही भारताचा भूभाग बळकावला आहे. अनेकदा देशात घुसखोरी केली जात आहे. डोकलाम येथे चीनच्या लष्करी हालचालींमुळे भारताच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावरही चीनकडून भारताच्या विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपल्याकडून दैनंदिन जीवनात चिनी वस्तूंच्या केल्या जाणाºया वापरामुळे अप्रत्यक्षपणे चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभारच लावला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा व चीनच्या कारवायांबाबत जागरूक राहावे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

या अंतर्गत समाजातील विविध संस्था, मंडळे, महिला बचत गटांना अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. चीनच्या कारवायांची माहिती देणारी व स्वदेशी वस्तूंबाबतची पत्रके वाटली जाणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाणार आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे; तसेच चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेस जिल्हा कार्यवाह केदार जोशी, संयोजक केशव गावेकर, जिल्हा संयोजक अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.