शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सृष्टिसौंदर्याचा मोह बनेल संकटांचा डोह!

By admin | Updated: August 5, 2014 00:08 IST

आनंद घ्या दुरून : धबधब्यात उतरणे, कड्यावर उभे राहणे, घाटात वाहने थांबविणे धोक्याचेच

परळी : डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा निसर्ग कितीही मनमोहक वाटत असला तरी निसर्गाचे स्वत:चे काही नियम असतात. ते नियम मोडणाऱ्यांना शिक्षा ही मिळतेच. सृष्टिसौंदर्याला भुलून कोणी मर्यादा ओलांडली तर अघटित घडणारच. ठोसेघर परिसरात सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. डोंगरकपऱ्यांतून कोसळणारे धबधबे, भुरभुणारा पाऊस, हिरवेगार गालिचे, धुक्यांची दुलई, भिजलेल्या रानवाटा सारं काही भुरळ पाडणारं; पण ही रानभूल धोक्याची ठरू शकते. निसर्गाचा आविष्कार अनुभवण्यासाठी राज्यभरातील पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात ठोसेघर परिसराला भेट देतात. सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. यामध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. सुटीच्या निमित्ताने पर्यटन सहलींची आयोजन करून युवक-युवती, नवदाम्पत्य याठिकाणी येत आहेत. निसर्गाचा आनंद लुटत असताना अनेकदा समोरच्या धोक्याची कल्पनाही येत नाही. पावसामुळे पाऊलवाटा निसरड्या झालेल्या असतात. पाय घसरून अपघात घडू शकतो. दुरून सुंदर दिसणारा निर्झर जवळून पाहिलाच पाहिजे, असा अट्टाहास अंगाशी येऊ शकतो. शेवाळलेल्या खडकांवरून घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे भलते धाडस न केलेलेच बरे. (वार्ताहर)पाण्याच्या प्रवाहात उतरणे टाळाडोंगरमाथ्यावरून वाहणारे ओव्हळ दरीतून वेगाने वाहत असतात. त्यामुळे खडकांची झिज होऊन त्यांना धार आलेली असते. त्या प्रवाहात उतरून फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण यामुळे दुखापत होऊ शकते. पाण्याच्या डोहात उतरणेही टाळले पाहिजे.मद्य प्राशन हवे कशाला?निसर्गसौंदर्यातच एवढी नशा आहे की ते पाहणारा तल्लीन होऊन जातो. यासाठी कुणाला मद्यप्राशन करण्याची गरजच काय? पण तरीही काही पर्यटक मद्य प्राशन करून रस्त्यात धिंगाणा घालत असतात. ज्याठिकाणी माणसाला आपला तोल सांभाळत चालावे लागते, तेथे मद्यपींची काय गत होईल, याचे भान ठेवायला हवे. घाटातील मौज धोकादायकघाटातील रस्ते अरुंद असतात. रस्त्यावर गाडी थांबविली तर मागून येणाऱ्या वाहनाला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यातच घाटात धुके पसरल्यामुळे पुढचे काहीच दिसत नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. रानवाटेवरून जरा जपूनपावसाळ्यात चिखलामुळे रानवाटा निसरड्या झालेल्या असतात. नागमोडी वाटांवरून भटकंती करताना घसरून आपटण्याची वेळ येऊ शकते.