शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात‘आव्हान’द्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By admin | Updated: May 26, 2017 19:07 IST

प्रशिक्षण शिबिराचा एक जूनला प्रारंभ; राज्यातील ‘एनएसएस’च्या १२०० स्वयंसेवकांचा सहभाग

 लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे ‘आव्हान’ या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरातून दिले जाणार आहेत. राज्यपालांच्या कार्यालयाच्या सूचनेनुसार यावर्षी दि. १ ते १० जूनदरम्यान विद्यापीठात हे शिबिर होणार आहे. यात राज्यातील विविध विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) सुमारे १२०० स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी सहभागी होणार आहेत. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास तिला कशा पद्धतीने सामोरे जावे, या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आव्हान प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. राज्यपालांच्या कार्यालयाच्या सूचनेनुसार दरवर्षी राज्यातील एक विद्यापीठ या शिबिराचे संयोजन करते. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. ५ ते १४ जूनदरम्यान ‘आव्हान’ झाले होते. यंदा या शिबिराचे संयोजन शिवाजी विद्यापीठ करीत आहे. शिबिरात पुणे येथील राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलातर्फे एनएसएसच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रात्यक्षिक आणि तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, ‘आव्हान’ची तयारी वेगाने सुरू आहे. यासाठी विविध २७ समित्यांच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे विद्यापीठाच्या ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.

आव्हान’मधील विद्यापीठाची कामगिरी आव्हान या शिबिराचे संयोजन शिवाजी विद्यापीठाने सन २००७ मध्ये केले होते. यानंतर राज्यात विविध विद्यापीठांत झालेल्या या शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाने यश मिळविले आहे. नागपूर येथे सन २०१४ मध्ये झालेल्या ‘आव्हान’मध्ये जनजागरण फेरीमधील उत्कृष्ट विद्यापीठाचा फिरता चषक पटकविला होता. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या शिबिरात विद्यापीठाने उत्कृष्ट संघनायक (डॉ. धनंजय लोहार) आणि उत्कृष्ट स्वयंसेवक (शिवाजी जाधव) या विभागात यश मिळविले होते.