शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

निराशा, अपयश हेच मोदींचे कर्तृत्व

By admin | Updated: June 3, 2016 01:35 IST

पत्रकार परिषदेत आरोप : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कोल्हापूर : देशातील आर्थिक, औद्योगिक विकासाच्या आणि चांगले दिवस आल्याबद्दलच्या जाहिरातींचा डंका कितीही पिटला तरी सर्वसामान्य नागरिकांची झालेली घोर निराशा आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश हेच नरेंद्र मोदी सरकारचे कर्तृत्व आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. राज्यातील दुष्काळ हा फडणवीस सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे निर्माण झाल्याचा आक्षेपही चव्हाण यांनी यावेळी नोंदविला. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सरकारच्या कामाचा लेखाजोखा करण्याची हीच योग्य वेळ असल्याने कॉँग्रेसचे नेते तो जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चव्हाण यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. देशातील जनतेला मोठी आश्वासने देऊन, जनतेच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या; परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता करता आलेली नाही. उलट देशात डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. शेजारच्या नेपाळ, चीन, पाकिस्तानसह अमेरिका, रशिया या महासत्तांसोबतचे आपले संबंध बिघडले असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. चव्हाण यांनी कॉँग्रेस व भाजप राजवटीत झालेल्या कामांचे तुलनात्मक मुद्दे पत्रकारांसमोर मांडले. त्यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था गडगडली आहे. कृ षी व औद्योगिक विकासदर खाली आला आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक पन्नास टक्के नफा देऊ, असे मोदींनी सांगितले होते. प्रत्यक्षात हमीभावात सहा टक्केच वाढ मिळाली. शेतीमालाच्या किमती आम्ही १५०० टक्क्यांनी वाढविल्या, तर मोदी सरकारने त्या दोन टक्क्यांनी वाढविल्या आहेत. कॉँग्रेस सरकारने डाळींच्या किमती ७० ते ८० रुपये किलो या दरावर स्थिर ठेवल्या. त्यासाठी साठाबंदीचे नियम अमलात आणले. आता मात्र हेच दर २०० रुपयांवर गेले आहेत. मोदींनी कमाल साठा बंदी उठविली. परिणामी व्यापाऱ्यांना तीन ते चार हजार कोटींचा फायदा झाला. देशातील दहा राज्यांत दुष्काळ असून प्रत्येक कुटुंबाला ‘मनरेगा’अंतर्गत १५० दिवस काम द्यायला पाहिजे असताना केवळ दीड टक्के लोकांनाच रोजगार मिळाला. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर होत आहे. करारांची माहिती द्यामोदी सरकार म्हणजे दररोज एक इव्हेंट करणारं सरकार असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ‘मेक इन इंडिया’ नावाच्या योजनेद्वारे मोदी यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईत प्रदर्शन भरविले. प्रदर्शनावेळी केंद्र सरकारने १५,२०,००० कोटींचे, तर राज्य सरकारने ८ लाख कोटींचे २५९४ करार केल्याचे सांगण्यात आले. या करारांमुळे किती उद्योग भारतात येणार आहेत, किती कोटींची आणि कोठे गुंतवणूक होणार, किती रोजगार उपलब्ध होणार याची माहिती आम्ही मागितली आहे; पण ती देण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे सरकार दिशाभूल करीत आहे, अशी आमची समजूत झाली आहे. भयानक दुष्काळ, कर्जमाफी करा सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्यात सन २००८ पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करावीत म्हणून मागणी केली; परंतु सरकारने ती मान्य केलेली नाही. काही शेतकरी औरंगाबाद उच्च न्यायालयात गेले आहेत. ६ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सांगितल्यावर तरी सरकार कर्जमाफी करणार का हे पाहावे लागेल, असे चव्हाण म्हणाले. वर्षाअखेरपर्यंत युती तुटणार शिवसेनेबरोबरचा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी युती सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे; परंतु कोल्हापूरचे पालकमंत्री आम्ही पर्यायी व्यवस्था केली असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था आहे की मध्यावधी निवडणुका होणार हे प्रत्यक्षात वर्षाअखेरीसच स्पष्ट होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)पृथ्वीराज चव्हाण म्हणतात.... फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे ५६,११४ कोटी रुपये थकविल्यामुळे अन्नसुरक्षा योजना राबविली जात नाही. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्यात येणार होता. प्रत्यक्षात दीड लाख रोजगार मिळाला. गेल्या दोन वर्षांत निर्यात वाढविणे सोडाच, त्यात मोठी घट होत आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. आर्थिक विकास दर दोन टक्क्यांनी वाढल्याचा दावा असला तरी याबाबत रिझर्व्ह बॅँकेलाच शंका वाटते. ‘मनरेगा’ योजनेची आधी टिंगल, नंतर पुन्हा सुरुवात केली; पण तुटपुंजी तरतूद आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. विजय मल्ल्या, ललित मोदी यांना पळून जाण्यास सरकारची मदत. स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी योजनांचा बोजवारा उडाला.