शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

बंदोबस्ताच्या परराज्यातील पोलिसांची गैरसोय

By admin | Updated: October 10, 2014 23:02 IST

कोल्हापुरात प्रकार : पाणी, प्रसाधनाची सोयच नाही

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागल्याने देशपातळीवर अनेक नेत्यांची किमान दररोज एक सभा जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परराज्यातून पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे. प्रशासनाने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची पुरेशी निवाऱ्याची सोय केलेली नाही. पाणी व प्रसाधनाची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी पोलिसांना ठेवले आहे. नागरी संरक्षणासाठी घरदार सोडून आलेल्या पोलिसांची व्यथा सोडविण्यासाठी प्रशासनाला लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे.आठवडाभर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांचा फड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी कोल्हापुरात हजेरी लावली आहे. यासाठी जिल्ह्यातील पोलीस बळ कमी पडत असल्याने मुंबईसह परराज्यांतील पोलिसांना पाचारण केले आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत हा फौजफाटा राहणार आहे.