शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

शेतकऱ्यांचे निढोरी कालव्याच्या अस्तरीकरणाअभावी नुकसान

By admin | Updated: November 18, 2014 00:07 IST

अधिकारी दुहेरी कात्रीत : कधी पाण्याविना, कधी पाण्यामुळेही तोटा

दत्तात्रय पाटील - म्हाकवे --काळम्मावाडी धरणामुळे राधानगरी, भुदरगडसह कागल तालुक्यात हरितक्रांती झाली. गेल्या २५ वर्षांपासून निढोरी कालव्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भाग पाण्याखाली आला हे सत्य असले, तरी या मुख्य कालव्यामुळे धरण क्षेत्रापासून काही अंतरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी, तर पाण्यामुळे नुकसान होणारे शेतकरी पाणी सोडू नये यासाठी आटापिटा करीत आहेत. यामध्ये अधिकारी आणि प्रशासनाची दमछाक होत आहे. काळम्मावाडी धरणापासून मुधाळतिट्ट्यापर्यंतच्या सुमारे २४ कि. मी. अंतर असणाऱ्या कालव्याचे दर्जेदार अस्तरीकरण होणे हाच यावरचा सोयीचा उपाय ठरणार आहे. १९९० मध्ये सुमारे २७ टी.एम.सी. पाणीसाठा असणाऱ्या काळम्मावाडी धरणातून निढोरी उजव्याकालव्याची खोदाई करण्यात आली. या मुख्य कालव्यातून सावर्डे, पिंपळगाव बुदु्रक, म्हाकवे मार्गे सीमाभागात जाणारा, बिद्री मार्ग, बाचणी, करनूरकडे तसेच निढोरीतून पश्चिमकडे जाणारा कूर कालवा आहे. या कालव्याच्या पाण्याने या लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आह; परंतु गेली १५ वर्षे अस्तरीकरण न झाल्यामुळे या कच्चा कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्याने शेकडो एकर शेती बाधित होत आहे. याचा मुख्य फटका ऐनी, आरेगाव, पंडेवाडी, कासारवाडा, कासारपुतळे, सावर्डे, आदी गावांतील शेतकऱ्यांना बसत आहे. या कालव्यातून कायम पाणी वाहत असल्यामुळे या २४ कि.मी. अंतरातील कालव्यानजीकच्या शेतीमध्ये कायम दलदल राहत असून, येथील शेतीला वाफसाच येत नाही. येथील शेती नापीक होण्याचा मोठा धोका संभवत आहे, तर कालव्यात पाणी सोडण्यामध्ये खंड पडल्यास मुदाळतिट्टा, म्हाकवे परिसर, बेलवळे, बाचणी परिसर आणि कूर भागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे येथील शेतकरी कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करीत आहेत. म्हाकवे परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदने दिली आहेत, तर जनता दल (सेक्युलर)चे अँड. अरुण सोनाळकर व शरद पाडळकर यांनी ऐनी परिसरातील शेतकऱ्यांचे सततच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी महिन्यातून २० दिवसच पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी गोची होत असून, त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अस्तरीकरण कळीचा मुद्दाधरणापासून तिट्ट्यापर्यंत असणाऱ्या २४ कि.मी. कालव्यातून ८५० क्युसेक पाणी सोडण्याची क्षमता आहे. मात्र, हा कालवा बहुतांशी ठिकाणी कमकुवत असल्यामुळे जोरदार पाण्याने फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या यातून सुमारे ४५० क्युसेक क्षमतेने पाणी साडले जाते. परिणामी म्हाकवेसह कर्नाटकातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अपुरे पाणी मिळते, तर सौंदलगा, आडीच्या पुढील भागात नितांत गरज असतानाही आणि येथील पोटकालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करूनही अद्याप पाणीच पोहोचलेले नाही. त्यामुळे किमान धरणापासून तिट्ट्यापर्यंतचे दर्जेदार अस्तरीकरण करणे हा सोयीचा पर्याय आहे.