शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

शेतकऱ्यांचे निढोरी कालव्याच्या अस्तरीकरणाअभावी नुकसान

By admin | Updated: November 18, 2014 00:07 IST

अधिकारी दुहेरी कात्रीत : कधी पाण्याविना, कधी पाण्यामुळेही तोटा

दत्तात्रय पाटील - म्हाकवे --काळम्मावाडी धरणामुळे राधानगरी, भुदरगडसह कागल तालुक्यात हरितक्रांती झाली. गेल्या २५ वर्षांपासून निढोरी कालव्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भाग पाण्याखाली आला हे सत्य असले, तरी या मुख्य कालव्यामुळे धरण क्षेत्रापासून काही अंतरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी, तर पाण्यामुळे नुकसान होणारे शेतकरी पाणी सोडू नये यासाठी आटापिटा करीत आहेत. यामध्ये अधिकारी आणि प्रशासनाची दमछाक होत आहे. काळम्मावाडी धरणापासून मुधाळतिट्ट्यापर्यंतच्या सुमारे २४ कि. मी. अंतर असणाऱ्या कालव्याचे दर्जेदार अस्तरीकरण होणे हाच यावरचा सोयीचा उपाय ठरणार आहे. १९९० मध्ये सुमारे २७ टी.एम.सी. पाणीसाठा असणाऱ्या काळम्मावाडी धरणातून निढोरी उजव्याकालव्याची खोदाई करण्यात आली. या मुख्य कालव्यातून सावर्डे, पिंपळगाव बुदु्रक, म्हाकवे मार्गे सीमाभागात जाणारा, बिद्री मार्ग, बाचणी, करनूरकडे तसेच निढोरीतून पश्चिमकडे जाणारा कूर कालवा आहे. या कालव्याच्या पाण्याने या लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आह; परंतु गेली १५ वर्षे अस्तरीकरण न झाल्यामुळे या कच्चा कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्याने शेकडो एकर शेती बाधित होत आहे. याचा मुख्य फटका ऐनी, आरेगाव, पंडेवाडी, कासारवाडा, कासारपुतळे, सावर्डे, आदी गावांतील शेतकऱ्यांना बसत आहे. या कालव्यातून कायम पाणी वाहत असल्यामुळे या २४ कि.मी. अंतरातील कालव्यानजीकच्या शेतीमध्ये कायम दलदल राहत असून, येथील शेतीला वाफसाच येत नाही. येथील शेती नापीक होण्याचा मोठा धोका संभवत आहे, तर कालव्यात पाणी सोडण्यामध्ये खंड पडल्यास मुदाळतिट्टा, म्हाकवे परिसर, बेलवळे, बाचणी परिसर आणि कूर भागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे येथील शेतकरी कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करीत आहेत. म्हाकवे परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदने दिली आहेत, तर जनता दल (सेक्युलर)चे अँड. अरुण सोनाळकर व शरद पाडळकर यांनी ऐनी परिसरातील शेतकऱ्यांचे सततच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी महिन्यातून २० दिवसच पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी गोची होत असून, त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अस्तरीकरण कळीचा मुद्दाधरणापासून तिट्ट्यापर्यंत असणाऱ्या २४ कि.मी. कालव्यातून ८५० क्युसेक पाणी सोडण्याची क्षमता आहे. मात्र, हा कालवा बहुतांशी ठिकाणी कमकुवत असल्यामुळे जोरदार पाण्याने फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या यातून सुमारे ४५० क्युसेक क्षमतेने पाणी साडले जाते. परिणामी म्हाकवेसह कर्नाटकातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अपुरे पाणी मिळते, तर सौंदलगा, आडीच्या पुढील भागात नितांत गरज असतानाही आणि येथील पोटकालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करूनही अद्याप पाणीच पोहोचलेले नाही. त्यामुळे किमान धरणापासून तिट्ट्यापर्यंतचे दर्जेदार अस्तरीकरण करणे हा सोयीचा पर्याय आहे.