शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे निढोरी कालव्याच्या अस्तरीकरणाअभावी नुकसान

By admin | Updated: November 18, 2014 00:07 IST

अधिकारी दुहेरी कात्रीत : कधी पाण्याविना, कधी पाण्यामुळेही तोटा

दत्तात्रय पाटील - म्हाकवे --काळम्मावाडी धरणामुळे राधानगरी, भुदरगडसह कागल तालुक्यात हरितक्रांती झाली. गेल्या २५ वर्षांपासून निढोरी कालव्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भाग पाण्याखाली आला हे सत्य असले, तरी या मुख्य कालव्यामुळे धरण क्षेत्रापासून काही अंतरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी, तर पाण्यामुळे नुकसान होणारे शेतकरी पाणी सोडू नये यासाठी आटापिटा करीत आहेत. यामध्ये अधिकारी आणि प्रशासनाची दमछाक होत आहे. काळम्मावाडी धरणापासून मुधाळतिट्ट्यापर्यंतच्या सुमारे २४ कि. मी. अंतर असणाऱ्या कालव्याचे दर्जेदार अस्तरीकरण होणे हाच यावरचा सोयीचा उपाय ठरणार आहे. १९९० मध्ये सुमारे २७ टी.एम.सी. पाणीसाठा असणाऱ्या काळम्मावाडी धरणातून निढोरी उजव्याकालव्याची खोदाई करण्यात आली. या मुख्य कालव्यातून सावर्डे, पिंपळगाव बुदु्रक, म्हाकवे मार्गे सीमाभागात जाणारा, बिद्री मार्ग, बाचणी, करनूरकडे तसेच निढोरीतून पश्चिमकडे जाणारा कूर कालवा आहे. या कालव्याच्या पाण्याने या लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आह; परंतु गेली १५ वर्षे अस्तरीकरण न झाल्यामुळे या कच्चा कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्याने शेकडो एकर शेती बाधित होत आहे. याचा मुख्य फटका ऐनी, आरेगाव, पंडेवाडी, कासारवाडा, कासारपुतळे, सावर्डे, आदी गावांतील शेतकऱ्यांना बसत आहे. या कालव्यातून कायम पाणी वाहत असल्यामुळे या २४ कि.मी. अंतरातील कालव्यानजीकच्या शेतीमध्ये कायम दलदल राहत असून, येथील शेतीला वाफसाच येत नाही. येथील शेती नापीक होण्याचा मोठा धोका संभवत आहे, तर कालव्यात पाणी सोडण्यामध्ये खंड पडल्यास मुदाळतिट्टा, म्हाकवे परिसर, बेलवळे, बाचणी परिसर आणि कूर भागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे येथील शेतकरी कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करीत आहेत. म्हाकवे परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदने दिली आहेत, तर जनता दल (सेक्युलर)चे अँड. अरुण सोनाळकर व शरद पाडळकर यांनी ऐनी परिसरातील शेतकऱ्यांचे सततच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी महिन्यातून २० दिवसच पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी गोची होत असून, त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अस्तरीकरण कळीचा मुद्दाधरणापासून तिट्ट्यापर्यंत असणाऱ्या २४ कि.मी. कालव्यातून ८५० क्युसेक पाणी सोडण्याची क्षमता आहे. मात्र, हा कालवा बहुतांशी ठिकाणी कमकुवत असल्यामुळे जोरदार पाण्याने फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या यातून सुमारे ४५० क्युसेक क्षमतेने पाणी साडले जाते. परिणामी म्हाकवेसह कर्नाटकातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अपुरे पाणी मिळते, तर सौंदलगा, आडीच्या पुढील भागात नितांत गरज असतानाही आणि येथील पोटकालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करूनही अद्याप पाणीच पोहोचलेले नाही. त्यामुळे किमान धरणापासून तिट्ट्यापर्यंतचे दर्जेदार अस्तरीकरण करणे हा सोयीचा पर्याय आहे.