शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त मोहिमेला अपंगत्व?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:26 IST

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला; परंतु काही लोकप्रतिनिधी तरुण, सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून आर्थिक आमिषे दाखवत असून शासनाच्या तंटामुक्त योजना अपंगत्वाच्या ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला; परंतु काही लोकप्रतिनिधी तरुण, सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून आर्थिक आमिषे दाखवत असून शासनाच्या तंटामुक्त योजना अपंगत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तंटामुक्त अध्यक्षांची मोकळीच फुशारकी.... घालत आहेत. तरी शासनाने अशा तंटामुक्ती गावात पुन्हा तंटा वाढ करणाºया लोकप्रतिनिधींवरती योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना गेली काही वर्षे संपूर्ण राज्यभर राबवली जात असून ग्रामीण भागामध्ये विविध कारणांमुळे उद्भवणारे वाद-तंटे गावच्या स्थानिक पातळीवर मिटावेत, अशी शासनाची अपेक्षा असून गाव तंटामुक्त झाले, तर गावाच्या प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले होऊन गावात शांतता लाभून सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून संघटितपणे प्रयत्न केल्यास गावाचा विकास होईल व तंट्याबद्दल उद्भवणाºया कोर्टकचेरीच्या त्रासातून ग्रामस्थांची सुटका होईल, अशी अपेक्षा शासनाची आहे.सध्या स्थानिक पातळीवर तडजोडीने तंटे, वाद मिटवण्याची आपल्याकडे तशी फार जुनी परंपरा आहे; परंतु हल्लीच्या कायद्याच्या राज्यात तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्ती समिती झाली. अध्यक्षांना आपल्या निर्णयाला कायदेशीर बैठक प्राप्त होण्यासाठी थोडे कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना कायदेशीर अधिकार मिळावेत आणि केवळ कागदोपत्री तंटामुक्ती होण्याऐवजी खरोखर गावात एकोपा निर्माण व्हावा, यासाठी त्यांची मानसिकता बनविण्यासाठी सक्षम नेतृत्व लोकप्रतिनिधींची गरज आहे. केवळ पुरस्कार मिळालेल्या गावात नव्हे, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांतील जास्तीत जास्त वाद, तंटे आपआपसात मिटविण्यासाठी ग्रामस्थ प्रतिनिधींच्या मदतीने पोलिसांनी प्रयत्न केल्यास पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी होईल व गावातील आपआपसातील वाद कमी होतील.सत्ता-पैसा यामुळे संघर्ष विकोपास१ सध्या शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींमध्ये सत्ता आणि पैसा यासाठी संघर्ष विकोपाला जात असून ग्रामीण भागामध्ये ग्र्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याने तर पुन्हा तंटावाढ होत आहे. गावामध्ये तंटाच राहिला नाही तर आपले राजकारण चालणार कसे? असा राजकीय लोकप्रतिनिधींचा मानस असतो.२ परिसरातील प्रत्येक खेड्यातील लोकप्रतिनिधी आपल्या स्वत:च्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी गावातील युवकांना हाताशी धरून तंटा मिटविण्यापेक्षा तंटा वाढविण्यावर भर देताना दिसत आहे. तरी तंटा वाढ करणाºया लोकप्रतिनिधींची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.