शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त मोहिमेला अपंगत्व?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:26 IST

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला; परंतु काही लोकप्रतिनिधी तरुण, सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून आर्थिक आमिषे दाखवत असून शासनाच्या तंटामुक्त योजना अपंगत्वाच्या ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला; परंतु काही लोकप्रतिनिधी तरुण, सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून आर्थिक आमिषे दाखवत असून शासनाच्या तंटामुक्त योजना अपंगत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तंटामुक्त अध्यक्षांची मोकळीच फुशारकी.... घालत आहेत. तरी शासनाने अशा तंटामुक्ती गावात पुन्हा तंटा वाढ करणाºया लोकप्रतिनिधींवरती योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना गेली काही वर्षे संपूर्ण राज्यभर राबवली जात असून ग्रामीण भागामध्ये विविध कारणांमुळे उद्भवणारे वाद-तंटे गावच्या स्थानिक पातळीवर मिटावेत, अशी शासनाची अपेक्षा असून गाव तंटामुक्त झाले, तर गावाच्या प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले होऊन गावात शांतता लाभून सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून संघटितपणे प्रयत्न केल्यास गावाचा विकास होईल व तंट्याबद्दल उद्भवणाºया कोर्टकचेरीच्या त्रासातून ग्रामस्थांची सुटका होईल, अशी अपेक्षा शासनाची आहे.सध्या स्थानिक पातळीवर तडजोडीने तंटे, वाद मिटवण्याची आपल्याकडे तशी फार जुनी परंपरा आहे; परंतु हल्लीच्या कायद्याच्या राज्यात तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्ती समिती झाली. अध्यक्षांना आपल्या निर्णयाला कायदेशीर बैठक प्राप्त होण्यासाठी थोडे कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना कायदेशीर अधिकार मिळावेत आणि केवळ कागदोपत्री तंटामुक्ती होण्याऐवजी खरोखर गावात एकोपा निर्माण व्हावा, यासाठी त्यांची मानसिकता बनविण्यासाठी सक्षम नेतृत्व लोकप्रतिनिधींची गरज आहे. केवळ पुरस्कार मिळालेल्या गावात नव्हे, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांतील जास्तीत जास्त वाद, तंटे आपआपसात मिटविण्यासाठी ग्रामस्थ प्रतिनिधींच्या मदतीने पोलिसांनी प्रयत्न केल्यास पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी होईल व गावातील आपआपसातील वाद कमी होतील.सत्ता-पैसा यामुळे संघर्ष विकोपास१ सध्या शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींमध्ये सत्ता आणि पैसा यासाठी संघर्ष विकोपाला जात असून ग्रामीण भागामध्ये ग्र्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याने तर पुन्हा तंटावाढ होत आहे. गावामध्ये तंटाच राहिला नाही तर आपले राजकारण चालणार कसे? असा राजकीय लोकप्रतिनिधींचा मानस असतो.२ परिसरातील प्रत्येक खेड्यातील लोकप्रतिनिधी आपल्या स्वत:च्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी गावातील युवकांना हाताशी धरून तंटा मिटविण्यापेक्षा तंटा वाढविण्यावर भर देताना दिसत आहे. तरी तंटा वाढ करणाºया लोकप्रतिनिधींची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.