शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

संचालक चौकशीला सामोरे जाणार

By admin | Updated: February 12, 2015 00:29 IST

राजाराम वरुटे : विरोधकांकडून आरोपांचा कांगावा करून शिक्षक बँकेची बदनामी

कोल्हापूर : विविध आरोपांचा कांगावा करून शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी विरोधक मागणी करीत आहेत. पायांखालची वाळू घसरू लागल्याने विरोधकांकडून हे उद्योग सुरू आहेत. त्यांनी कोणत्याही थराला जाऊन बँकेची सत्ता घेण्याचे ठरविले आहे; पण सभासद ते कधीही होऊ देणार नाहीत. कोणत्याही आणि कितीही चौकशांना सामोरे जाण्यास माझ्यासह संचालक मंडळाची तयारी आहे, अशी माहिती दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष वरुटे म्हणाले, विरोधकांनी आॅगस्ट २०१३ मध्ये जिल्हा उपनिबंधकांकडे सत्तारूढ संचालकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली. त्यानुसार करवीरचे सहनिबंधक प्रदीप मालगावे यांनी चौकशी केली. त्यातील अहवालामध्ये कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. त्यावर विरोधकांनी पुन्हा सप्टेंबर २०१४ मध्ये कोल्हापूर उपनिबंधकांनी चौकशी करावी, अशी लेखी मागणी केली. त्यानुसार कोल्हापूर शहरचे सहायक निबंधक रंजन लाखे यांनी चौकशी केली. यात त्यांनी तरलता राखणे, डिव्हिडंड वाटप यांबाबत परवानगी घेणे आवश्यक होते, अशा सूचना केल्या आहेत. त्याचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आरोपांचा कांगावा सुरू आहे. विद्यमान संचालक मंडळाने याची चौकशी सखोल व्हावी म्हणून सहकार्य केले आहे. त्यामुळे पुन्हा चौकशी केल्यास तिला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. मागील संचालक मंडळासारखे आम्ही चौकशीला न्यायालयाची स्थगिती कधीच घेणार नाही. बँकेत मोठे खर्च करताना त्याबाबत सर्वसाधारण सभेत विषय मांडून मंजुरी घेतली आहे. काम झाल्यानंतरही खर्चाला मंजुरी घेतली आहे. विरोधकांच्या तथ्यहीन आरोपांमुळे बँकेची बदनामी होत आहे. बदनामीप्रकरणी विरोधकांवर दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष वसंत जोशीलकर, संचालक सुभाष निकम, रावसाहेब देसाई, डी. पी. पाटील, बी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. शिक्षक संघच राहील...शिक्षक संघाची पकड जिल्ह्यासह राज्यात चांगली आहे. विरोधकांमध्ये समिती व पुरोगामी शिक्षक संघटनेमध्ये निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार नाही. या संघटना एकत्र निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वरुटे यांनी सांगितले. ते म्हणाले, या पद्धतीने संबंधित संघटना लढल्यास भविष्यात त्यांचे अस्तित्व राहणार नसून शिक्षक संघ ही एकमेव संघटना राहणार आहे.