शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तनास दिशा-लक्ष्मीसेन महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:18 IST

जयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल.

ठळक मुद्देजयसिंगपुरात मराठी जैन साहित्य संमेलनाची सांगतासमाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल. शहर शताब्दी वर्ष आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदरम्यान झालेला हा सोहळा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर मठाचे प.पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांनी केले. समाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

येथील चौथ्या गल्लीत सोनाबाई इंगळे सभागृहात साहित्य पुरस्कार प्रदान व समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षा लीलावती शहा म्हणाल्या, संमेलन समिती संयोजकांनी संमेलनांचे नेटके आणि यशस्वी नियोजन केले आहे.परिषदेचे मुख्यसचिव डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले, स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर खºयाअर्थाने शहर व परिसरात त्यांचे विचार जोपासण्याचे काम त्यांचे पुत्र राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रामाणिकपणे केले आहे.

स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी वसविलेल्या व शताब्दीवर्षात ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीत मराठी जैन साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमींचा ज्ञानोत्सव झाला.

राजेंद्र झेले यांनी स्वागत केले. सचिव प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गजकुमार शहा व अब्दुल रजपूत यांनी मनोगते व्यक्त केली. खासदार राजू शेट्टी यांनी संमेलनाला भेट दिली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, बी. टी. बेडगे, डॉ. अजित पाटील, सुरेश रेडेकर, विजय आवटी, डॉ. बी. ए. शिखरे, डॉ. सुरेश पाटील, पा. पा. पाटील, अ‍ॅड. धनपाल बेळंके, एम. के. घुमाई, डी. डी. मंडपे, सचिन पाटील, सागर अडगाणे, प्रा. आप्पा भगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद मगदूम यांनी केले. दादासो पाटील-चिंचवाडकर यांनी आभार मानले.पुरस्काराने सन्मानितप्राचार्य गजकुमार शहा यांना साहित्य पुरस्कार, सोलापूरच्या कवयित्री सोनल पाटील यांना रत्नत्रय पुरस्कार, शाहीर कुंतीनाथ करके यांना रत्नाक्का मिरजी साहित्य पुरस्कार, श्रीपाल जर्दे यांना क्रीडा पुरस्कार, विजापूरचे अब्दुल रजपूत यांना जैन शिल्प संरक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.