शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तनास दिशा-लक्ष्मीसेन महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:18 IST

जयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल.

ठळक मुद्देजयसिंगपुरात मराठी जैन साहित्य संमेलनाची सांगतासमाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल. शहर शताब्दी वर्ष आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदरम्यान झालेला हा सोहळा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर मठाचे प.पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांनी केले. समाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

येथील चौथ्या गल्लीत सोनाबाई इंगळे सभागृहात साहित्य पुरस्कार प्रदान व समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षा लीलावती शहा म्हणाल्या, संमेलन समिती संयोजकांनी संमेलनांचे नेटके आणि यशस्वी नियोजन केले आहे.परिषदेचे मुख्यसचिव डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले, स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर खºयाअर्थाने शहर व परिसरात त्यांचे विचार जोपासण्याचे काम त्यांचे पुत्र राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रामाणिकपणे केले आहे.

स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी वसविलेल्या व शताब्दीवर्षात ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीत मराठी जैन साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमींचा ज्ञानोत्सव झाला.

राजेंद्र झेले यांनी स्वागत केले. सचिव प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गजकुमार शहा व अब्दुल रजपूत यांनी मनोगते व्यक्त केली. खासदार राजू शेट्टी यांनी संमेलनाला भेट दिली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, बी. टी. बेडगे, डॉ. अजित पाटील, सुरेश रेडेकर, विजय आवटी, डॉ. बी. ए. शिखरे, डॉ. सुरेश पाटील, पा. पा. पाटील, अ‍ॅड. धनपाल बेळंके, एम. के. घुमाई, डी. डी. मंडपे, सचिन पाटील, सागर अडगाणे, प्रा. आप्पा भगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद मगदूम यांनी केले. दादासो पाटील-चिंचवाडकर यांनी आभार मानले.पुरस्काराने सन्मानितप्राचार्य गजकुमार शहा यांना साहित्य पुरस्कार, सोलापूरच्या कवयित्री सोनल पाटील यांना रत्नत्रय पुरस्कार, शाहीर कुंतीनाथ करके यांना रत्नाक्का मिरजी साहित्य पुरस्कार, श्रीपाल जर्दे यांना क्रीडा पुरस्कार, विजापूरचे अब्दुल रजपूत यांना जैन शिल्प संरक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.