शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

थेट नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली

By admin | Updated: April 6, 2016 00:38 IST

इचलकरंजी नगरपालिका : भाजप स्वतंत्र लढणार का?, शहर विकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न

राजाराम पाटील -- इचलकरंजी ‘जनतेतून नगराध्यक्ष’ असा प्रयोग पुन्हा शासन राबविण्याचा विचार करीत असून, त्यामुळे येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत होणाऱ्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुतांशी नगराध्यक्ष भाजपचे निवडले जातील, असा व्होरा भाजपचा आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त भाजपकडून ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविली जाणार का, याचीच चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांकडूनसुद्धा अनेक प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग, असा प्रयोग नुकताच सन २0११ मध्ये राबविण्यात आला होता. मात्र, आता दोन नगरसेवकांचा एक प्रभाग, असा प्रयोग राबविण्याचा विचार भाजप करीत आहे. त्यामुळे राज्यातील आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे किंवा भाजपच्या विचारसरणीशी मिळतेजुळते उमेदवार अधिक संख्येने निवडले जातील, असा तर्क लढविला जात आहे. त्याचबरोबर जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेल्यास राज्यातील मोठ्या शहरांमध्ये नगराध्यक्ष भाजपचा होईल, असाही एक विचार आता समोर येत आहे.यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सन १९७४-७५मध्ये झालेल्या पालिकांच्या निवडणुकीत ‘जनतेतून नगराध्यक्ष’ हा प्रयोग सर्वांत प्रथम राबविण्यात आला. त्यावेळी इचलकरंजीत असलेल्या नागरी आघाडीचे पंडितराव कुलकर्णी विरुद्ध काँग्रेसचे मल्हारपंत बावचकर अशी सरळ लढत झाली होती. या लढतीत पंडितराव कुलकर्णी निवडून आले. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसचे बहुमत झाले. त्यांनी मांडलेले अनेक विषय काँग्रेस बहुमताने फेटाळत होते. त्यामुळे कुलकर्णी यांना नगरपालिकेचे कामकाज चालविता आले नाही. दोन ते अडीच वर्षांत यांची कारकीर्द त्यावेळी संपुष्टात आली.त्यानंतर सन २00५ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ‘जनतेतून नगराध्यक्ष’ ही संकल्पना पुन्हा राबविली. त्यावेळी इचलकरंजीत किशोरी आवाडे (काँग्रेस), कलावती जांभळे (बंडखोर अपक्ष) व आशादेवी कदम (नागरी आघाडी) अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये किशोरी आवाडे या बहुमताने निवडून आल्या. मात्र, त्यावेळी काँगे्रसचे बहुमत झाले नसल्याने त्यांना अन्य पक्षांबरोबर आघाडी करून कामकाज चालवावे लागले. अशा प्रकारे इचलकरंजी नगरपालिकेचा आतापर्यंतचा इतिहास असून, या पार्श्वभूमीवर ‘जनतेतून नगराध्यक्ष’ ही संकल्पना येथे राबविली जात असताना भाजप स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढविणार का, अशा आशयाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण सध्याचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्थापन केलेली शहर विकास आघाडी नगरपालिकेत कार्यरत आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असेल, तर शहर विकास आघाडीचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.‘भाजप’च्या नगराध्यक्षांची उत्सुकताभाजपकडे सर्वसाधारणपणे हिंदुत्ववादाचा अंगीकार करणारा पक्ष म्हणून पाहिले जाते. इचलकरंजीत मात्र आगामी नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे, अशा पार्श्वभूमीवर जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा झाल्यास भाजपकडे उमेदवार कोण, असाही प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. उलट काँग्रेस व राष्ट्रवादीकडून काही इच्छुकांनी तशा हालचाली सुरू केल्या असून, सध्या ते विविध उपक्रमांद्वारे जनतेच्या समोर येत आहेत.