शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिनकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही सुनेच ?

By admin | Updated: October 13, 2015 00:38 IST

रसिकांकडून कार्यक्रमांची अपेक्षा : मराठी चित्रपटसृष्टीची चार दशके गाजविली

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या ग्रामीण चित्रपटांनी ठसा उमटविणारे चित्रपट दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही कोणत्याच कार्यक्रमाविना सुनेच जाणार काय, असा सवाल चित्रपट रसिक व्यक्त करीत आहेत. ६ नोव्हेंबर ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण ‘लोकमत’ने सर्वप्रथम करून दिली, तेव्हा कोठे कोल्हापुरात काही कार्यक्रम झाले. तो सोहळा उत्तमरीत्या पार पडल्यानंतर आता दिनकर द. पाटील यांच्या जन्मशताब्दीचीही आठवण कोल्हापुरकरांना करावी लागणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून काही कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा चित्रपट रसिकांकडून व्यक्त होत आहे. मूळचे कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील बेनाडी गावचे असलेल्या पाटील यांनी कोल्हापुरातून कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. मा. विनायक यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. कोल्हापुरातील चित्रनगरी, शालिनी सिनेटोन, जयप्रभा या स्टुडिओंना नावारूपास आणण्यामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पाटील यांचे ‘पाटलाचे पोर’ हे आत्मचरित्र १९८४ मध्ये प्रकाशित झाले असून, त्याचा अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवाद झाला आहे. तथापि, सध्या मराठीतच या पुस्तकाची आवृत्ती उपलब्ध नाही. या आत्मचरित्राची आवृत्ती पुन्हा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून महोत्सवाबरोबरच कार्यक्रम होणे गरजेचे आहे. राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, माय बहिणी, नवरा म्हणून नये आपला, कामापुरता मामा, मल्हारी मार्तंड, कोर्टाची पायरी, कुंकू माझं भाग्याचं, सुलक्षणा, कुलदैवत, माझी आई, संताजी धनाजी, अधिकार, शिवरायांची सून ताराराणी, कुंकवाचा टिळा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. आपल्या ग्रामीण ढंगात चित्रपटांमधून तत्कालीन सामाजिक विषयावर त्यांनी भाष्य केले.१९५० ते १९९० या चार दशकांच्या कालखंडात त्यांनी ३६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक चित्रपटांच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या काही गाजलेल्या पटकथांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.मी मराठीत पहिल्यांदा काम केले ते दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटात. त्यांनी आपल्या चित्रपटांतून ग्रामीण महाराष्ट्र दाखवितानाच सामाजिक आशयही दिला. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांचे हे योगदान कायम स्मरणात राहील.- सुभाष भुरके, कार्यवाह, मराठी चित्रपट महामंडळमराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे स्मरण पहिल्यांदा करवीरकरांनी केले पाहिजे. ज्यांनी खस्ता खाल्या त्या काही दिग्गजांची जन्मशताब्दी करणे ही चित्रपट व्यावसायिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकवेळी सगळ््याच गोष्टी करणे हे महामंडळालाही शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा.- यशवंत भालकर, दिग्दर्शक