शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दिनकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही सुनेच ?

By admin | Updated: October 13, 2015 00:38 IST

रसिकांकडून कार्यक्रमांची अपेक्षा : मराठी चित्रपटसृष्टीची चार दशके गाजविली

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या ग्रामीण चित्रपटांनी ठसा उमटविणारे चित्रपट दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही कोणत्याच कार्यक्रमाविना सुनेच जाणार काय, असा सवाल चित्रपट रसिक व्यक्त करीत आहेत. ६ नोव्हेंबर ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण ‘लोकमत’ने सर्वप्रथम करून दिली, तेव्हा कोठे कोल्हापुरात काही कार्यक्रम झाले. तो सोहळा उत्तमरीत्या पार पडल्यानंतर आता दिनकर द. पाटील यांच्या जन्मशताब्दीचीही आठवण कोल्हापुरकरांना करावी लागणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून काही कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा चित्रपट रसिकांकडून व्यक्त होत आहे. मूळचे कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील बेनाडी गावचे असलेल्या पाटील यांनी कोल्हापुरातून कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. मा. विनायक यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. कोल्हापुरातील चित्रनगरी, शालिनी सिनेटोन, जयप्रभा या स्टुडिओंना नावारूपास आणण्यामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पाटील यांचे ‘पाटलाचे पोर’ हे आत्मचरित्र १९८४ मध्ये प्रकाशित झाले असून, त्याचा अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवाद झाला आहे. तथापि, सध्या मराठीतच या पुस्तकाची आवृत्ती उपलब्ध नाही. या आत्मचरित्राची आवृत्ती पुन्हा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून महोत्सवाबरोबरच कार्यक्रम होणे गरजेचे आहे. राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, माय बहिणी, नवरा म्हणून नये आपला, कामापुरता मामा, मल्हारी मार्तंड, कोर्टाची पायरी, कुंकू माझं भाग्याचं, सुलक्षणा, कुलदैवत, माझी आई, संताजी धनाजी, अधिकार, शिवरायांची सून ताराराणी, कुंकवाचा टिळा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. आपल्या ग्रामीण ढंगात चित्रपटांमधून तत्कालीन सामाजिक विषयावर त्यांनी भाष्य केले.१९५० ते १९९० या चार दशकांच्या कालखंडात त्यांनी ३६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक चित्रपटांच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या काही गाजलेल्या पटकथांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.मी मराठीत पहिल्यांदा काम केले ते दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटात. त्यांनी आपल्या चित्रपटांतून ग्रामीण महाराष्ट्र दाखवितानाच सामाजिक आशयही दिला. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांचे हे योगदान कायम स्मरणात राहील.- सुभाष भुरके, कार्यवाह, मराठी चित्रपट महामंडळमराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे स्मरण पहिल्यांदा करवीरकरांनी केले पाहिजे. ज्यांनी खस्ता खाल्या त्या काही दिग्गजांची जन्मशताब्दी करणे ही चित्रपट व्यावसायिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकवेळी सगळ््याच गोष्टी करणे हे महामंडळालाही शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा.- यशवंत भालकर, दिग्दर्शक