शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

दिनकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही सुनेच ?

By admin | Updated: October 13, 2015 00:38 IST

रसिकांकडून कार्यक्रमांची अपेक्षा : मराठी चित्रपटसृष्टीची चार दशके गाजविली

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या ग्रामीण चित्रपटांनी ठसा उमटविणारे चित्रपट दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही कोणत्याच कार्यक्रमाविना सुनेच जाणार काय, असा सवाल चित्रपट रसिक व्यक्त करीत आहेत. ६ नोव्हेंबर ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण ‘लोकमत’ने सर्वप्रथम करून दिली, तेव्हा कोठे कोल्हापुरात काही कार्यक्रम झाले. तो सोहळा उत्तमरीत्या पार पडल्यानंतर आता दिनकर द. पाटील यांच्या जन्मशताब्दीचीही आठवण कोल्हापुरकरांना करावी लागणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून काही कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा चित्रपट रसिकांकडून व्यक्त होत आहे. मूळचे कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील बेनाडी गावचे असलेल्या पाटील यांनी कोल्हापुरातून कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. मा. विनायक यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. कोल्हापुरातील चित्रनगरी, शालिनी सिनेटोन, जयप्रभा या स्टुडिओंना नावारूपास आणण्यामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पाटील यांचे ‘पाटलाचे पोर’ हे आत्मचरित्र १९८४ मध्ये प्रकाशित झाले असून, त्याचा अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवाद झाला आहे. तथापि, सध्या मराठीतच या पुस्तकाची आवृत्ती उपलब्ध नाही. या आत्मचरित्राची आवृत्ती पुन्हा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून महोत्सवाबरोबरच कार्यक्रम होणे गरजेचे आहे. राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, माय बहिणी, नवरा म्हणून नये आपला, कामापुरता मामा, मल्हारी मार्तंड, कोर्टाची पायरी, कुंकू माझं भाग्याचं, सुलक्षणा, कुलदैवत, माझी आई, संताजी धनाजी, अधिकार, शिवरायांची सून ताराराणी, कुंकवाचा टिळा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. आपल्या ग्रामीण ढंगात चित्रपटांमधून तत्कालीन सामाजिक विषयावर त्यांनी भाष्य केले.१९५० ते १९९० या चार दशकांच्या कालखंडात त्यांनी ३६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक चित्रपटांच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या काही गाजलेल्या पटकथांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.मी मराठीत पहिल्यांदा काम केले ते दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटात. त्यांनी आपल्या चित्रपटांतून ग्रामीण महाराष्ट्र दाखवितानाच सामाजिक आशयही दिला. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांचे हे योगदान कायम स्मरणात राहील.- सुभाष भुरके, कार्यवाह, मराठी चित्रपट महामंडळमराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे स्मरण पहिल्यांदा करवीरकरांनी केले पाहिजे. ज्यांनी खस्ता खाल्या त्या काही दिग्गजांची जन्मशताब्दी करणे ही चित्रपट व्यावसायिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकवेळी सगळ््याच गोष्टी करणे हे महामंडळालाही शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा.- यशवंत भालकर, दिग्दर्शक